नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ल्याला (Pulwama Attack) नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही मोदींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करत लिहिलं की, 14 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी चित्रीकरण करण्यात व्यस्त होते. पुलवामा येथे आपल्या जवानांना मरण्यासाठी सोडून दिलं. पुलवामा येथे हल्ला होणार याची गुप्त माहिती आधीच मिळाली होती. असं असतानाही मोदींनी त्याकडं लक्ष दिलं नाही. गुप्त माहितीवर वेळीच कारवाई करायला हवी होती. त्याकडं कानाडोळा का केला असा प्रश्नही राहुल गांधींनी केला आहे.
On 14th Feb 2019, the PM was busy shooting a film having ignored prior intelligence inputs and leaving our jawans to die in Pulwama.
Why were actionable intelligence inputs ignored? pic.twitter.com/XZWKuaW4UG
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 16, 2021
14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे CRPF जवानांच्या एका तुकडीवर दहशतवादी हल्ला (Pulwama Attack) झाला होता. यात 40 जवांना हौतात्म्य आलं तर अनेक जण जखमी झाले होते. पूर्ण देश या घटनेनं हळहळला होता. या दिवशी पीएम मोदी डिस्कव्हरी वाहिनीसाठी बियर ग्रिल्स सोबत भारतीय जंगलात चित्रीकरण करत होते. यावरून विरोधकांनी मोदींवर सडकून टीका केली होती.
- ‘कंबरदुखी’पासून खुप परेशान आहात ? ‘या’ टीप्स फॉलो केल्या तर मिळेल आराम
- Video : सपना चौधरीच्या गाण्यावरील ‘या’ अभिनेत्रीचा डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
- Pulwama Attack 2019 : ‘हल्ल्याबद्दलच्या गुप्त माहितीकडे PM मोदींनी दुर्लक्ष का केलं ?, राहुल गांधींचा प्रश्न
- वासिम जाफरने ‘या’ कारणामुळे दिला राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश; मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा झाला होता आरोप
- Business Idea : स्टॅम्प पेपरच्या व्यवसायातून भरपूर पैसा कमावण्याची संधी ! कमी पैशात मिळेल जास्त नफा, जाणून घ्या
- उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्यांनी आहारात ‘या’ 5 गोष्टींचा करावा समावेश, ‘हाय ब्लड प्रेशर’ येईल कंट्रोलमध्ये, जाणून घ्या