IMPIMP

Aditya Thackeray | ‘खाऊन खाऊन अपचन झालेले गेले, लाज शिल्लक असेल तर…, – आदित्य ठाकरे (व्हिडीओ)

by nagesh
Aditya Thackeray | shivsena leader aditya thackeray attacks rebel mlas and cm eknath shinde in bhiwandi thane

भिवंडी : सरकारसत्ता ऑनलाइन मला गद्दारी केलेल्यांना एकच गोष्ट सांगायची आहे. जरा लोकांमध्ये फिरा आणि त्यांच्या भावना समजून घ्या. जे गेलेत त्यांच्या रक्तात शिवसेना कधीच नव्हती. बंड किंवा उठाव करायला ताकद लागते. तुम्ही केलेला उठाव नाही. ती गद्दारीच आहे. खाऊन-खाऊन अपचन झालेले लोक सोडून गेलेत, अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे नाव न घेता केली. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) भिवंडीत शिवसैनिक आणि पदाधिकार्‍यांच्या सभेत बोलत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सध्या शिवसंवाद यात्रेच्या (Shiv Samvad Yatra) माध्यमातून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. आज आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जाहीर सभा घेत शिंदे सरकारवर (Shinde Government) जोरदार हल्लाबोल केला.

सभेत आदित्य ठाकरे म्हणाले, हिंमत असती तर राज्यात थांबून बंड केले असते. हिंमत असती तर येथून सूरतेला पळाले नसते. तिथे गुवाहाटीला जाऊन 40 आमदार (MLA) मजा मारुन आले. तुमच्यात थोडीशीही लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा (Resignation) द्या आणि निवडणुकीला (Election) सामोरे जा.

ते पुढे म्हणाले, मी लहानपणापासून पहात आलो. जे लोक हक्काने घरी यायचे. कामे घेऊन यायचे आणि नवी जबाबदारी मागायचे. कुटुंबातील माणसारखे यांना आजवर शिवसेनेने (Shivsena) सांभाळले. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला. ज्या शिवसेनेने दिले त्याच पक्षाशी गद्दारी केली. या आमदारांनी केलेले बंड तुम्हाला पटले का? असा सवाल आदित्य यांनी शिवसैनिकांना केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आदित्य ठाकरे म्हणाले, खरेतर आपले एक चुकले की आपण राजकारण (Politics) कमी केले आणि समाजकारणावर जास्त भर दिला.
आपल्याशी गद्दारी यासाठीच होते की आपण विरोधी पक्षाच्या आमदारांवर कधी लक्ष देत नाही.
त्यांच्यावर दबाव आणत नाही किंवा त्यांना त्रास देत नाही.

या सभेत राज्यातील नवे सरकार लवकरच कोसळणार असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
ते म्हणाले, सध्या सुरू असलेले राजकारण नाही, ही सर्कस आहे.
आज जे निष्ठावंत शिवसेनेसोबत आहेत ते खरे शिवसैनिक आहेत आणि ते घाबरणारे नाहीत.
घाबरणारे असते तर सूरतेला गेले असते. आज ते ठामपणे शिवसेनेच्या पाठिशी उभे आहेत.
हे नवे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. लिहून घ्या.

Web Title :- Aditya Thackeray | shivsena leader aditya thackeray attacks rebel mlas and cm eknath shinde in bhiwandi thane

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘ते जरुर पर्यावरणमंत्री असतील, पण…’ देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

Sonia Gandhi | ‘मी इंदिरा गांधींची सून आहे, कुणालाही…’, जुना व्हिडीओ व्हायरल (व्हिडीओ)

Gold Price Today | सोने आणि चांदीत मोठी घसरण, खरेदीपूर्वी ताबडतोब जाणून घ्या नवीन दर

Related Posts