IMPIMP

Devendra Fadnavis on Thackeray Government | देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाची हत्या झाली’

by Team Deccan Express
Devendra Fadnavis | bjp leader devendra fadnavis on shivsena chief uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन   Devendra Fadnavis on Thackeray Government | मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासह (Madhya Pradesh OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. यामुळे शिवराज सिंह चौहान सरकारला (Shivraj Singh Chouhan Government) एक मोठा दिलासा मिळाला. तसेच, 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नसावे, असं न्यायालयानं नमुद केलं आहे. शिवराज सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली. यानंतर महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप (BJP) महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) घणाघात करत आहे.

मध्य प्रदेशच्या निकालानंतर महाराष्ट्रालाही न्याय मिळेल आणि आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासह होतील, असा विश्वास देखील महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे.
”महाराष्ट्र सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत वर्षभर केंद्र सरकारकडे (Central Government) बोट दाखवलं.
त्यानंतर कमिशन तयार केलं पण त्याला पैसे दिले नाहीत. तसेच न्यायालयात थातूर – मातूर अहवाल सादर करत स्वत:चं हसू करून घेतलं.
संबंधित अहवालावर सही नव्हती, तारीख नव्हती आणि डेटाही नव्हता.” असं फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis on Thackeray Government)

महाराष्ट्रात ओबीसी राजकीय आरक्षणाची (Maharashtra Politics OBC) हत्या महाविकास आघाडी सरकारने केली आहे.
महाराष्ट्रानंतर सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश बाबतही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याबाबत निकाल दिला होता.
परंतु, मध्य प्रदेश सरकारने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी समर्पित कमिशन तयार केलं.
त्याच्या माध्यमातून मध्य प्रदेशात जिल्हानिहाय प्रत्येक स्थानिक प्रशासनामार्फत डेटा तयार केला.
म्हणून त्यांना ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी मिळाली असल्याचं,” फडणवीस म्हणाले.

पुढे फडणवीस म्हणाले, ”आपल्याकडे मात्र केवळ राजकारण झालं. मंत्री भाषण करत राहिले, मोर्चे काढत राहिले, मुख्यमंत्र्यांनी यात कोणतंही लक्ष घातलं नाही.
त्यामुळे आज मध्य प्रदेशला परवानगी मिळाली आणि महाराष्ट्राचा अजूनही एम्पिरिकल डेटा तयार झालेला नाही.
त्यामुळे मला असं वाटतं की, सरकारमधील जे जबाबदार असतील त्यांनी राजीनामाच द्यायला हवा,” असा घणाघात त्यांनी केला.

Web Title :- Devendra Fadnavis on Thackeray Government | obc political reservation murdered in maharashtra devendra fadnavis criticize mahavikas aghadi and thackeray government

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts