मुंबई : राज्यात कोरोना covid-19 व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, तरीदेखील नागरिकांकडून कोरोनासंबंधी covid-19 नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे आता ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला असून, रात्री 8 नंतर बाहेर पडल्यास दंड वसूल केला जाणार आहे. तसेच 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन Lockdown वाढवण्यात आला आहे.
Devendra Fadnavis : ‘अखेर महाविकास आघाडी सरकारला सुबुद्धी झाली’
🚨Directions for Containment & Management of COVID-19🚨 pic.twitter.com/n7SNEUw7vN
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 27, 2021
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात असल्याची माहिती आहे. त्यानुसार, सरकारकडून वेळोवेळी सूचनांचे पालन करण्याचे सांगितले जात आहे. कोरोनाबाधित covid-19 रुग्णांची ही वाढती संख्या पाहता राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत (Mission Begin again) निर्बंध अधिक कडक केले आहेत. राज्यात 28 मार्चपासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीनुसार, रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडू नये, असे सांगण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘सचिन वाझेंच्या 3 मालकांना फक्त ‘ही’ एकच चिंता’
याशिवाय पाचपेक्षा अधिक जणांनी एकत्र बाहेर पडण्यावर बंदी आहे. तसेच मास्क न लावणे, रस्त्यावर थुंकणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे अशा व्यक्तीला दंड करण्यात येणार आहे. या कुठल्याही नियमांचे पालन न करणाऱ्यांना दंड करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
शरद पवारांनी राज्यमंत्री भरणे यांची ‘ती’ इच्छा एका क्षणात केली पूर्ण
हॉटेल, थिएटर, बार रात्री 8 नंतर बंद
हॉटेल, बार, सिनेमागृहसुद्धा रात्री आठनंतर बंद होतील. रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत सर्व सार्वजनिक आस्थापना बंद राहतील. या काळात होम डिलिव्हरी सर्व्हिस मात्र सुरू राहील. मास्क न लावता कुणीही व्यक्ती आढळली तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
Also Read
भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’
होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा
Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर
PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली
‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका
PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू
दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार
‘IPS शुक्ला यांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरलीय, खंडणीखोरीचे बिंग फुटले’; भाजप नेत्याची टीका
Rohit Pawar : ‘भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का ?’