नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावू लागलं आहे. पहिल्या लाटेवर मात केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) देशवासियांशी ‘मन की बात’ Mann ki Baat केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लॉकडाऊनच्या वर्षपूर्तीनिमित्त काही आठवणींना उजाळा दिला.
Bhandup Fire : ‘ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे 12 बळी’; भाजपची टीका
गेल्या वर्षी मार्च महिन्यातच देशाने पहिल्यांदा जनता कर्फ्यू शब्द ऐकला. महान देशातील जनतेच्या शक्तीची अनुभूती म्हणजे जनता कर्फ्यू संपूर्ण जगासाठी आदर्श उदाहरण ठरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी म्हटलं आहे. हे शिस्तिचं अभूतपूर्व असं उदाहरण होतं. येणाऱ्या पिढ्यांना गोष्टीचा गर्व वाटेल. तसेच कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ आपण वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या आणि लावलेले दिवे हे सर्व कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेले. त्यामुळेच कोरोना योद्ध्ये वर्षभर न थकता, न थांबता सेवा करत राहिले, असे मोदी यांनी म्हटले आहे.
अश्लील व्हिडीओ प्रकरणी भाजपचे माजी मंत्री अडचणीत ! तरुणीच्या तक्रारीनंतर FIR दाखल
कोरोना योद्ध्यांचे कौतुक करताना मोदी पुढे म्हणाले, देशाच्या प्रत्येक नागरिकाचा प्राण वाचवण्यासाठी कोरोना योद्ध्ये लढत राहिले. गेल्या वर्षी कोरोना लस कधी येणार ? असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण आता आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, ती म्हणजे भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ Mann ki Baat मध्ये म्हटले.
शरद पवारांनी राज्यमंत्री भरणे यांची ‘ती’ इच्छा एका क्षणात केली पूर्ण
महिला खेळाडूंचं अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी विविध क्रीडा प्रकारात ठसा उमटवणाऱ्या महिला खेळाडूंचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, योगायोग म्हणजे मार्च महिन्यात जेव्हा आपण महिला दिन साजरा करत होतो, तेव्हा अनेक महिला खेळाडूंनी पदकं आणि विक्रमांची आपल्या नावावर नोंद केली. दिल्लीत झालेल्या नेमबाजी स्पर्धेत भारत पहिल्या क्रमांकावर राहिला. सुवर्ण पदकांमध्येही भारताने बाजी मारली. भारताच्या महिला आणि पुरुष नेमबाजांनी चांगली कामगिरी केली. याचपद्धतीने पी.व्ही. सिंधूने देखील सिल्व्हर मेडल जिंकले, असे सांगत मोदींनी महिला खेळाडूंचे अभिनंदन केले. एका हिंदी वेबसाईटने या संदर्भात वृत्त दिले आहे.
During the 75 episodes, we discussed innumerable topics including rivers to himalayan peaks, deserts to natural disasters, tales of service to mankind, technological inventions to stories of innovations from remote areas: PM Narendra Modi during the 75th episode for Mann Ki Baat pic.twitter.com/Y2OCIrByUC
— ANI (@ANI) March 28, 2021
In the month of March when we are celebrating Women's Day, many women players secured records and medals in their name. India bagged top position during the ISSF World Cup shooting organised at Delhi. India also topped the gold medals tally: PM Modi during #MannKiBaat pic.twitter.com/jE5C41LDT7
— ANI (@ANI) March 28, 2021
Recently Mithali Raj has become the first Indian woman cricketer to have made ten thousand runs. Many congratulations on her achievement: PM Modi during #MannKiBaat pic.twitter.com/hCNjrwWGWx
— ANI (@ANI) March 28, 2021
Programmes in connection with Amrit Mahotsav are being held throughout the country. Be it struggle saga of a freedom fighter; be it history of a place or any cultural story from country, you can bring it to fore during Amrit Mahotsav& become a means to connect with countrymen: PM pic.twitter.com/uAteftAOs0
— ANI (@ANI) March 28, 2021
During the 75 episodes, we discussed innumerable topics including rivers to himalayan peaks, deserts to natural disasters, tales of service to mankind, technological inventions to stories of innovations from remote areas: PM Narendra Modi during the 75th episode for Mann Ki Baat pic.twitter.com/Y2OCIrByUC
— ANI (@ANI) March 28, 2021
‘भारतीयांपेक्षा अधिक लसी परदेशात पाठवल्याची कबुली सरकारनं UN समोर दिली, पण जर…’
देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘सचिन वाझेंच्या 3 मालकांना फक्त ‘ही’ एकच चिंता’