मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कॅन्सरच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केल्यानंतर म्हाडा आता विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांनी केली आहे. मुंबई शहरामध्ये 4 ठिकाणी असे वसतिगृह बांधण्यात येतील, असेही ते म्हणाले.
राज्यात पुन्हा Lockdown की कठोर निर्बंध? CM उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 pm ला जनतेला संबोधित करणार
After helping out cancer patients by way of temporary accommodation #MHADA plans to help students with hostel facility ail over #Mumbai target is 1000 students the first will be at jajamata nagar Kalachowki 500 students can be accomadated pic.twitter.com/sgUpPYYY5Q
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2021
म्हाडाकडून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती जितेंद्र आव्हाड jitendra awhad यांनी ट्विट करून दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘मुंबई, ठाण्यामधील म्हाडा कॉलनीमध्ये एक-एका इमारतीचा विकास करण्यासाठी तेथील रहिवाशांबरोबर सामंजस्य करार केला आहे. पण अनेक वर्षे या इमारतींचा विकास केला नाही, रहिवाशांना भाडेही दिले नाही. मुजोरपणाची वागणूक हे विकसक करत आहेत, हे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे 5 वर्षांपेक्षा अधिक जर विकसकाने इमारतीचे काम रोखून ठेवली. तर म्हाडा ती इमारत स्वत: डेव्हलप करेल आणि विकासकाचा करार रद्द समजण्यात येईल’.
महाराष्ट्रात लॉकडाऊन? CM ठाकरेंनी बोलावली आज महत्त्वाची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता
तसेच ते पुढे म्हणाले, ‘राज्यात केवळ 7-8 दिवस पुरेल इतका रक्तसाठा शिल्लक आहे. कोरोनाला न घाबरता, सोशल डिस्टसिंग पाळून विशेषत: आज तरुण-तरुणींनी बाहेर पडून रक्तदान करावे. कोणाचे तरी प्राण वाचविण्यासाठी आपले रक्त उपयुक्त ठरेल.’
‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान
‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’
‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?
‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य
Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे