IMPIMP

MNS Raj Thackeray On Bhagat Singh Koshyari | राज ठाकरे यांनी कोश्यारींची ‘होशियारी’ काढली; म्हणाले – ‘मराठी माणसाला डिवचू नका !’

by nagesh
औरंगाबाद विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केले होते.

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS Raj Thackeray On Bhagat Singh Koshyari | मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी (Financial Capital) म्हणता येणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्याने राज्यात संतप्त पडसाद उमटत आहेत. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसे (MNS), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP), शिवसेना  (Shivsena) या पक्षांनी राज्यपालांना घेरले आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी राज्यपालांवर हल्लाबोल केल्यानंतर आता खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे शैलीत ’कोश्यारींची होशियारी’ काढली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज ठाकरे यांनी राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर म्हटले आहे की, आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे पद आहे म्हणून आपल्याविरुद्ध बोलायला लोक कचरतात. परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसाने (Marathi People) येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना ? दुसरीकडे त्यांना असे वातावरण मिळेल का ? (MNS Raj Thackeray On Bhagat Singh Koshyari)

राज ठाकरे यांनी इशारा देत म्हटले की, उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितले म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका.
तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकेच आत्ता आपल्याला सांगतो.

काय म्हणाले होते राज्यपाल…

मुंबईत (Mumbai) एका नामकरण सोहळ्यात बोलताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले, कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की,
मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत.
मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते.
मात्र, गुजराती (Gujarati People) आणि राजस्थानी लोकांना (Rajasthani People) काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही.
या कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा (Navneet Rana), आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana), नितेश राणे (Nitesh Rane),
अमित साटम (Amit Satam), भारती लवेकर (Bharti Lovekar) व पंकज भोयर (Pankaj Bhoyer),
नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा (Remo D’Souza) व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी (Rakesh Kothari) इ. उपस्थित होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  MNS Raj Thackeray On Bhagat Singh Koshyari | mns chief raj thackeray slams governor bhagat singh koshyari over his statement on mumbai

हे देखील वाचा :

Skin Care Tips | चेहर्‍यावरील मुरुमांनी त्रस्त आहात का? मग ‘या’ 4 प्रकारे करा लाल चंदनाचा वापर

Bhagat Singh Koshyari | महाराष्ट्रात सर्वत्र संतापाची लाट उसळल्यानंतर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं स्पष्टीकरण, म्हणाले..

CM Eknath Shinde Group | 65:35 चा फॉर्म्युला, पण महत्त्वाच्या खात्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा तिढा ?

Related Posts