मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – सरकारने (Modi Government) रेशनकार्डधारकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आता सरकारने
कार्डधारकांना १५० किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा सरकारने नुकतीच केली आहे. देशातील करोडो लोकांना सरकार
(Modi Government) मोफत रेशन देते, या योजनेचा अनेकजण फायदा घेतात. जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेता यावा,
यासाठी सरकार यात नेहमी बदल करत असते. त्यात आता रेशन डिजिटल पद्धतीने वाटले जाते.
अनेक कुटुंबांना त्यांच्या सदस्य संख्येनुसार प्रत्येक महिन्याला रेशन दिले जाते. आता रेशनमध्ये पहिल्यापेक्षा जास्त धान्य मिळणार आहे. त्यानुसार गरिबांना पूर्वीच्या १३० किलोऐवजी १५० किलोपर्यंत तांदूळ मिळणार आहे. ज्यांना याअगोदर ३५ किलो तांदूळ मिळत होते, त्यांना आता १३५ किलो तांदूळ मिळेल, तर काही ग्राहकांना १५० किलो तांदूळ मिळणार आहे. मात्र, सरकारने यासाठी काही अटी घातल्या आहेत.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
ही योजना छत्तीसगड येथील बीपीएल कार्डधारकांसाठी सुरू केली आहे.
याचा लाभ फक्त छत्तीसगडच्या रहिवासियांना मिळणार आहे.
केंद्र सरकारकडूनही मोफत रेशन वितरण ऑक्टोबरपासून सुरू होणार होते, पण अजूनही सुरू झालेले नाही.
Web Title :- Modi Government | good news for ration card holders 150 kg of grain will be free the government made a big announcement
Pune Crime | जत्रेतील भांडण मिटवणाऱ्या तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण; पुणे जिल्ह्यातील घटना