मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – पक्षात होणारी घुसमट, अन्याय जाहीरपणे मांडत शिंदे गटात (Shinde Group) गेलेले शिवसेना नेते (Shivsena Leader) रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (Shivsena) टीका केली आहे. यापूर्वी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केल्यानंतर आता रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना लक्ष्य केले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी 50 टक्के शिवसेना संपवली, असा आरोप कदम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.
रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी म्हटले की, 50 टक्के शिवसेना ही मिलिंद नार्वेकर यांनी संपवली. उद्धव ठाकरे यांना कळले सुद्धा नाही. कुठलीही व्यक्ती थेट उद्धव ठाकरे यांना भेटली तर ते मिलिंद नार्वेकर यांना आवडत नसे. त्याचा काटा कसा काढायचा. त्याला पुन्हा उद्धव ठाकरे यांना भेटू द्यायचे नाही, याचे व्यवस्थित प्लॅनिंग मिलिंद नार्वेकर करायचे.
कदम पुढे म्हणाले की, जवळच्याच माणसांनी उद्धव ठाकरे यांचा घात केला. मग सुभाष देसाई (Subhash Desai) असतील. मिलिंद नार्वेकर असतील, आणखी काही मंडळींची नावे मी पुढे घेणार आहे. उद्धवजींच्या सोबत राहून त्यांना अंधारात ठेवून त्यांनी पक्षाचे नुकसान केले. निवडणुका आल्या की, पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांना भेटा.
—
मिलिंद नार्वेकरांना भेटण्याआधी कुणी थेट पुढे गेला तर त्याचे तिकीट कापले गेले म्हणून समजायचे, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे.
कुणी बोलत नाही. कारण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ? बोलला तर संपला तो माणूस.
आमदार असेल तर तिकिट नाही, नगरसेवक असेल तर तिकिट नाही, अशी परिस्थिती होती,
असा आरोप कदम (Ramdas Kadam) यांनी केला.
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना सवाल विचारताना कदम (Ramdas Kadam) यांनी म्हटले की, मला आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत काही म्हणायचे नाही.
महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जो काही संभ्रम निर्माण झाला आहे,
तो दूर करण्यासाठी काही गोष्टींचा खुलासा होणे आवश्यक आहे.
मी आदित्य ठाकरे यांना विचारतो की,
शिवसेनाप्रमुख जिवंत असते तर त्यांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीसोबत (NCP) युती करू दिली असती का ?
काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ दिले असते का ?
Web Title : – Ramdas Kadam | milind narvekar single handedly ended 50 % of shivsena uddhav thackeray didnt know ramdas kadam alleges