मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sachin Sawant | भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या लोकसभेच्या मिशन ४५ आणि विधानसभेच्या २०० जागा जिंकण्यासाठी करण्यात आलेल्या मिशन -२०२४ या भाजपच्या अभियानावर काँग्रेसनेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी जोरदार टीका केली आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
सचिन सावंत म्हणाले, ‘ भाजपच्या (BJP) “महाविजय २०२४” संकल्पातून स्पष्टपणे दिसून येते की, भाजपाच्या दृष्टिने शिंदे गटाचा उपयोग फक्त शिवसेना (Shivsena) तोडण्यासाठी आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्याशी युती होणार नाही व विलीनीकरण होऊ शकते. असो, महाराष्ट्रातून भाजपची हकालपट्टी अपरिहार्य आहे हे हल्लीच्या निवडणूक निकालातून स्पष्ट होते.’ असे काँग्रेसनेते सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहे.
"महाविजय २०२४" संकल्पातून स्पष्टपणे दिसून येते की भाजपच्या दृष्टिने शिंदे गटाचा उपयोग फक्त शिवसेना तोडण्यासाठी आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्याशी युती होणार नाही व विलीनीकरण होऊ शकते. असो, महाराष्ट्रातून भाजपची हकालपट्टी अपरिहार्य आहे हे हल्लीच्या निवडणूक निकालातून स्पष्ट होते.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 14, 2023
सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आपल्या ट्वीटमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक व पदवीधर निवडणुकांचा देखील संदर्भ दिल्याचे दिसत आहे.
नाशिकमध्ये भाजप राज्य कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे (Vinod Tawde), पंकजा मुंडे (Pankaja Munde), मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यावेळी उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकांवर चर्चा झाली.
यावेळी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारसंघनिहाय पूर्णवेळ कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाणार आहे. असे जाहीर केले.
समारोप सत्रात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महाविकास आघाडीने अडीच वर्ष वाया घालवली.
त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपला अडीच वर्षांत पाच वर्षांचे काम करायचे आहे.’
तर यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या घटनाबाह्य सरकारच्या आरोपांचा देखील चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘उरलेसुरलेले लोक पक्षांतर करू नये, म्हणून त्यांना तसे बोलावे लागते.
राज्यात स्थापन झालेले सरकार १०० टक्के कायदेसंमत आहे. न्यायालयाचा निकालही आपल्या बाजूने येणार आहे.
हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करून नव्याने दीडपट जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येईल.’
असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Sachin Sawant | in bjps view shinde group is only used to break shivsena sachin sawant
Devendra Fadnavis | सवंग प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ पातळी गाठली – राष्ट्रवादी
Jalgaon Crime News | दुर्दैवी ! आत्तेभावाच्या लग्नाला जाताना 37 वर्षीय महिलेचा अपघात; जळगावमधील घटना