IMPIMP

Sanjay Raut On CM Eknath Shinde | ‘एकनाथ शिंदे स्वत:ला ‘भाई’ समजतात; मग शेपूट घालून का बसतात’ – संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut | maharashtra in unsafe state in country say sanjay raut allegation shinde government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Sanjay Raut On CM Eknath Shinde | कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सरळ सरळ दादागिरी करत आहेत आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत:ला भाई म्हणवतात आणि शेपूट घालून शांत बसतात, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे भाई आहेत ना, मग त्यांनी कर्नाटक विरोधात भाईगिरी करून दाखवावी, असेही संजय राऊत यावेळी मुख्यमंत्र्यांना म्हणाले. (Sanjay Raut On CM Eknath Shinde)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्य सरकार जमिनीचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. त्यांना एक क्षणही सत्तेवर थांबण्याचा अधिकारी नाही. गेल्या 55 वर्षांत महाराष्ट्राने इतके हतबल, दुबळे सरकार आणि मुख्यमंत्री पाहिला नव्हता. मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई कर्नाटकला जाणार होते. पण, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्यावर त्यांनी लगेच शेपूटच घातले. हे कसले मर्द आणि स्वाभिमानी? हे तर नामर्दांचे सरकार आहे, असा घाणाघात राऊत यांनी केला. कर्नाटकच्या कन्नड वेदिके रक्षणच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक केली. त्यामुळे या सीमावादाला हिंसक वळण लागले आहे. त्यावर राऊत यांनी संताप व्यक्त करत शिंदे सरकारला धारेवर धरले आहे.

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून तीन महिन्यांत महाराष्ट्र दिल्लीच्या दारातील पाय पुसणे झाला आहे. सीमेवर वाद आणि गोंधळ आहे तसेच आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गृहमंत्र्यांची भेट घेत आहेत. त्यांना माहीत नाही का, कर्नाटकात काय सुरू आहे? महाराष्ट्रावर अशी वेळ कधीही आली नव्हती. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे डरपोक आहे. त्यांना आपल्या सीमांची आणि जनतेची काळजी नाही. आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला नाजूक करण्यासाठी प्रकल्प गुजरातला पाठवले जात आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोंडाला कुलूप लावून आहेत. हे सरकार दिल्लीकडून टेंडर घेऊन आलेले सरकार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे.
महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा हा खेळ सुरू झाला आहे.
बेळगावातील हल्ले याच कटाचा भाग आहे. महाराष्ट्रात तीन महिन्यांत क्रांती झाली म्हणतात.
हीच का यांची क्रांती? महाराष्ट्र एवढा लेचापेचा कधी झाला नव्हता.
तो शिंदे आणि फडणवीस सरकारने केला आहे, असे यावेळी राऊतांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sanjay Raut On CM Eknath Shinde | Shivsena MP Sanjay Raut On Maharashtra CM Eknath Shinde

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | गैरवर्तन करून महिलेचा विनयभंग; देहूरोड येथील घटना

Rajinikanth-Baba Movie | 20 वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होतोय रजनीकांत यांचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट

Sangli ACB Trap | 1700 रूपयाची लाच घेताना नागरी सुविधा केंद्रातील महिला ऑपरेटरसह तिचा मुलगा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Related Posts