सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन– Vishwajeet Kadam | काँग्रेस नेते आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam)
यांनी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) सत्ता स्थापनेचा किस्सा सांगितला आहे. ‘विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आम्ही सत्तेत येऊ
असं वाटत नव्हतं, पण ‘बरं झालं, शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अंगात आलं, अन् तीन पक्षांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं,’
असं विश्वजित कदम म्हणाले.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
डॉ. विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी मंगळवारी रात्री पलूस तालुक्यातील आमणापूर गावातील विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तब्बल अडीच तास वेळ दिला. बोरजाईनगर, श्रीराम मळा, विठ्ठलवाडी, अनुगडेवाडी आमणापूर येथील विविध विकासकामांचे उद्घाटन राज्यमंत्री डॉ. कदम यांनी केले आहे.
त्यावेळी बोलताना कदम म्हणाले, “आम्ही निवडून आलो, विरोधी बाकांवर बसावे लागणार होते.
मात्र खासदर संजय राऊत यांच्या अंगात आले. एकत्र येणारच नाहीत असे पक्ष एकत्र आले,
आणि राज्याची सत्ता महाविकास आघाडीच्या हाती आली,” असं डॉ. विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विश्वजीत कदम यांनी आपल्या व्यग्र कार्यक्रमातून उशीरा का होईना, परंतु, मंगळवारी रात्री आमणापूर गावातील विविध विकासकामांसाठी तब्बल अडीच तास वेळ दिला. यावेळी आमणापूर ग्रामस्थांना संबोधित करताना राज्यमंत्री चांगलेच मूडमध्ये होते.
Web Title :- Vishwajeet Kadam | maharashtra minister vishwajeet kadam reveal about mva government formation shivsena leader sanjay raut
Mumbai Silver Oak Agitation | सिल्व्हर ओक आंदोलनात अटक झालेल्या ‘त्या’ महिला वाहकाचे निधन