मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या अनेक नव्या गाण्यामुळे चर्चेत येत असतात. विविध गाणी गायल्याने त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. नुकतंच अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना एका नवीन गाण्याबाबत माहिती दिली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, गणेशोत्सवाच्या आधी आपलं नवीन गाणं येत आहे. यावरुन आता त्याचं नवीन गाणं रिलीज झालं आहे. ‘गणेश वंदना’ (‘Ganesh Vandana’) या नावाने त्याचं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update
अमृता फडणवीस यांनी ‘गणेश वंदना’ या गाण्यामधुन त्यांनी एक सुंदर मेसेज दिला आहे. कोरोना काळातील कोविड योद्ध्यांना हे गाणं त्यांनी समर्पित केलंय. एकूण 4 मिनिट 49 सेकंदाचं हे गाणं आहे. या गाण्यामध्ये अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या डॉक्टरच्या (Doctor) रुपात दिसुन येत आहेत. दरम्यान, गणेश वंदना’ हे गाणे सर्व डॉक्टर आणि आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना समर्पित केलं आहे. ‘भक्तीचे दुसरे नाव सेवा’ असे त्यांनी या गाण्याच्या माध्यमातुन सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
'Ganesh Vandana' is OUT NOW on @TimesMusicHub Spiritual👉 https://t.co/BMnjptZKDl
Set to music by Vijay Dayal, 'Ganesh Vandana' is a beautiful union of 'Aum Gan Ganpataye' & ‘Morya Re'.
Hope this track connects with you, like it connects with me!
#GaneshChaturthi #Ganeshotsav pic.twitter.com/Gs7AUCpgyq— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 3, 2021
या दरम्यान, अमृता यांनी हे गाणे गायिले असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना कोणताही सण, उत्सव असो समाजप्रतीची त्यांची कर्तव्ये पार पाडावी लागतात हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या गाण्यामधुन केला आहे. अमृता फडणवीस या गायन क्षेत्रात करिअर करत आहेत. गाणं हा त्यांचा आवडता छंद आहे, या आगोदरही त्यांची अनेक गाणी रिलीज झाली आहेत.
Web Title : Amruta Fadnavis | amrita fadnaviss new song released message conveyed through song ganesh vandana
Ajit Pawar | ‘राज्यात पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका, नियम पाळा’ – अजित पवार
Ajit Pawar | ‘गणेशोत्सवात पहिल्या दिवशी गर्दी झाल्यास दुसऱ्या दिवसापासून कठोर निर्बंध लावणार’