सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – एकाच महाविद्यालयात शिकणा-या दोघी मैत्रीणी एकमेकांच्या प्रेमात पडल्या. दोघेही एकमेकींसोबत लग्न (married) करण्यासाठी घर सोडून पळाल्या होत्या. मात्र दोघींच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली आणि त्यांची कहाणी अधुरी राहिली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील गिडा पोलीस स्टेशन हद्दीत ही हैराण करणारी घटना समोर आली आहे.
दोघेही एकमेकींसोबत लग्न (married) करण्यासाठी घर सोडून पळाल्या होत्या. त्यानंतर घरच्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या दोघींना पंजाबच्या जालंधरमधून अटक केली. अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जेंव्हा या दोघींची चौकशी केली तेंव्हा दोघीही एकमेकींसोबत लग्न करण्यासाठी अडून बसल्या होत्या. दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्या काही ऐकायला तयार नव्हत्या. यानंतर पोलिसांनी अपहरणाच्या केसमध्ये वयस्क मैत्रिणीला कोर्टात हजर केले. तिथून तिला तुरूंगात पाठवण्यात आले.
Bhandara fire case : भंडारा दुर्घटनेप्रकरणी 40 दिवसानंतर 2 नर्सवर FIR दाखल
कोल्हापूर : वडगावचे माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांचे निधन
जळगाव : राम मंदिरासाठी अवैधरित्या ‘वर्गणी’ची वसूली, FIR दाखल
‘फडणवीसांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही’ – नाना पटोले