मुंबई : राज्यात कोरोना Corona व्हायरसचा उद्रेक वाढत आहे. त्यानुसार कोरोनाबाधित रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेतेमंडळींनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यातही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यात 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता
कोरोनाबाधित Corona रुग्णांची संख्या राज्यात वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याबाबतची माहिती अजित पवार यांनी स्वत: पत्रकारांना दिली. माझ्या निवासस्थानी असलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 9 जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. मात्र, यामध्ये कोणाला कोरोनाचा संसर्ग झाला हे त्यांनी सांगितले नाही.
दरम्यान, कोरोना Corona व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. दररोज अडीच ते तीन हजार नवे रुग्ण आढळत आहेत. मंत्री धनंजय मुंडे, बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तर यापूर्वी अजित पवार यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले आहेत.
Also Read :
Ramdas Athawale : ‘ठाकरे सरकार कलंकित, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’
संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत ? काँग्रेसचा संतप्त सवाल
‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य
मोठी बातमी ! अखेर राऊतांनी फडणवीस मुख्यमंत्री न होण्याचे सांगितलं कारण; म्हणाले…
परमबीर सिंग, गृहमंत्री देशमुख यांच्यातील वाद उच्च न्यायालयात, 30 मार्चला सुनावणी
सरकारी कर्मचार्यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर