पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – पंढरपूर विधानसाभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. दोन्ही पक्षांनी आपआपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला आहे. प्रचारादरम्यान भाजपने महाविकास आघाडी सरकारवर तर सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्ष भाजपवर टीका केली. याच दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे महाविकास आघाडी सरकार बदलण्याची जबाबदारी माझ्यावर सोडा असे वक्तव्य केले होते. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी, महाविकास आघाडी सरकारला बोटाच्या नखाएवढाही धक्का लागणार नाही. हे सरकार स्थिर आहे, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले.
चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’
पुण्यात कोरोना आढावा बैठकीचे आयोनजन करण्यात आले होते. बैठकी नंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. अजित पवार ajit pawar म्हणाले, पंढरपूर आणि मंगळवेढ्यात काही झालं तर आम्ही जबाबदार असू. निवडणूका आयोगाने लावल्या तर, आम्ही उमेदवार उभा केला म्हटल्यावर प्रचार तर करणारच. निवडणुका लावल्यावर घरातुन तर प्रचार होऊ शकत नाही. आमच्या हातात सहकारातील निवडणुका पुढे ढकलणं होतं. आम्हालाही अनेकदा वाटतं की निवडणुका लागायला नको. थोड्या नंतर किंवा कोरोना कमी झाल्यानंतर झाल्या असत्या तर चाललं असतं.
100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी
राजकीय मी बोलत नाही. केंद्राने व्हॅक्सिन एक्सपोर्ट करायची गरज नव्हती. रेमडेसिविर निर्यातीची गरज नव्हती. पण असं म्हणलं की मी राजकीय बोलतो अशी टीका करणार ,असाही टोला पवार यांनी यावेळी लगावला.
Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…
अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’
Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’