सरकारसत्ता ऑनलाइन टीम – सचिन वाझे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माणूस आहे. त्यांनाच त्यांचं रिपोर्टींग व्हायचं. परमबीर सिंग यांना ते विचारतच नव्हते असा आरोप करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. सचिन वाझे वर्षावर जाऊन कसे राहायचे ? त्यांना कुणी परवानगी दिली ? असा सवालही त्यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीसोबत ते बोलत होते. यावेळी त्यांनी याबाबत भाष्य केलं.
‘… म्हणून सचिन वाझेंना वाचवायचे प्रयत्न झाले’
नितेश राणे Nitesh Rane म्हणाले, सचिन वाझे थेट उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना रिपोर्टींग करायचे. परमबीर सिंग यांना ते विचारत नव्हते. ते आदित्य ठाकरेंसोबत ऑनकॉल होते. म्हणून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न होत होते असा दावाही त्यांनी केला आहे.
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन
‘सचिन वाझे वर्षावर कुणाच्या परवानगीनं रहायचे ?’
सचिन वाझे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी राहायचे असा खळबळजनक आरोप नितेश राणे Nitesh Rane यांनी यावेळी बोलताना केला. ते म्हणाले, सचिन वाझे वर्षावर का रहायचे ? वर्षा कुणाचं निवासस्थान आहे ? वर्षावर रहायची परवानगी त्यांना कुणी दिली होती ? त्यामुळंच सचिन वाझे थेट उद्धव ठाकरे यांचा माणूस आहे असंही नितेश राणे म्हणाले.
‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’
एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…
परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा
भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान
शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना राज्यात ‘No Entry’ ! ठाकरे सरकार आणणार स्वतंत्र कायदा
…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य