मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख anil deshmukh यांच्यावर वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत केली जावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर या सर्व आरोपांची चौकशी होणार असल्याने अनिल देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आमदाराने जोर लावला आहे.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी anil deshmukh महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे तपासात कोणतेही अडथळे येऊ नये आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून देशमुख यांनी राजीनामा दिला.
नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच आहे अस दिसतय..
ज्याना परमवीर सिंह ने 100 कोटी बद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेच काय ?
मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना ??— nitesh rane (@NiteshNRane) April 5, 2021
त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘नैतिकता फक्त अनिल देशमुखांकडेच anil deshmukh आहे असं दिसतंय…ज्यांना परमवीर सिंहने 100 कोटीबद्दल माहिती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेचे काय? मीठी नदीत तर शोधायला लागणार नाही ना?’
Sanjay Raut : ‘मी सरकारशी संबंधित व्यक्त नाही, मी बोलणं योग्य नाही’
सीबीआयला चौकशीसाठी 15 दिवसांची मुदत
अॅड. जयश्री पाटील यांनीही उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने अॅड. पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे.
हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’
मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?
ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…
Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)
हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’