नवी दिल्ली : पश्मिच बंगालमधील राजकारण आरोप, प्रत्यारोपांनी चांगलेच तापले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी smriti irani यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येसाठी ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दोषी ठरवत आहेत. यातून त्यांचे संस्कार दिसतात, अशा शब्दात इराणी यांनी बॅनर्जींवर बोचरी टीका केली आहे.
संजय राऊतांच्या आवाहनानंतर गडकरींचा बेळगाव दौरा रद्द? देवेंद्र फडणवीस जाणार प्रचाराला
स्मृती इराणी smriti irani यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, मला हे ऐकून धक्काच बसला की, कोरोना महामारीसाठी त्या मोदीजी आणि अमित शहा यांना जबाबदार ठरवत आहेत. पण हेच ममता बॅनर्जी यांचे संस्कार आहेत. मोदीजी त्यांचा उल्लेख दीदी म्हणून करतात आणि त्या आमच्या नेत्यांसाठी सार्वजनिक व्यासपीठावरून अपशब्दांचा वापर करतात. असे म्हणत स्मृती इराणी यांनी ममता बॅनर्जींवर टीकास्त्र सोडले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भाजपावर गंभीर आरोप केला होता. आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. मात्र भाजपामुळे संसर्ग पुन्हा वाढला असे म्हणत ममतांनी भाजपावर हल्लाबोल केला होता. भाजपाने प्रचारासाठी बाहेरील राज्यांतून माणस आणल्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप आता ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यावर स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी
चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’
‘शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्त्यांचे, इतरांचे काय?’, निलेश राणेंचा सवाल
नाना पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले -‘फडणवीसांचे जर दिल्लीत वजन असेल तर…
‘डबल रोल’ ! एकीकडे मुलीची भूमिका निभावत असताना दुसरीकडे नेत्याची भूमिका पार पाडत आहेत सुप्रिया सुळे
चंद्रकांत पाटलांचे सरकार पाडण्याबाबत पुन्हा मोठं वक्तव्य; म्हणाले…
भाजपचं पितळ उघडं पाडण्यासाठी काँग्रेसकडून यू-ट्यूब चॅनल लाँच