सरकारसत्ता ऑनलाइन टीम – औरंगाबादमध्ये 31 मार्चपासून सुरू होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. इतकंच नाही तर कार्यकर्त्यांनी जलील यांना पुष्पहार घालत रस्त्यावर त्यांची मिरवणूकही काढली. इम्तियाज जलील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडला. याच पार्श्वभूमीवर आता जलील यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#WATCH Maharashtra: AIMIM MP Imtiaz Jaleel's supporters carried him on shoulders & celebrated y'day in Aurangabad after admn decided to lift lockdown there. He says, "I thank people who supported our demand (to lift lockdown)& admn which understood that lockdown will affect poor" pic.twitter.com/Gr7gkWeuM6
— ANI (@ANI) March 31, 2021
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबाद शहरात लॉकडाऊनच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यानंतर खासदार इम्तियाज जलील Imtiaz Jaleel यांच्या समर्थकांनी आणि व्यापाऱ्यांनी एकच जल्लोष केला. जलील यांना खांद्यावर बसवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. विशेष म्हणजे मिरवणुकीत कोणीही मास्क लावला नव्हता. सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांनाही धाब्यावर बसवण्यात आलं होतं.
ठाकरे स्मारकाच्या भूमीपूजनाला एकनाथ शिंदेंनाही डावललं? भाजप आमदारानं शेअर केली निमंत्रण पत्रिका !
भाजप नेते संजय केनेकर आणि इतर पदाधिकारी यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. जोपर्यंत इम्तियाज जलील Imtiaz Jaleel यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशाराच त्यांनी दिला होता. अखेर इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन
याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनीही हा प्रकार समोर आल्यानंतर इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार टीका केली होती.
‘एमआयएमच्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का ?’
अमेय खोपकर यांनी ट्विट करत यावर भाष्य केलं होतं. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, एमआयएमच्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का ? संभाजीनगरमध्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षानं मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करून नाचताना शरम वाटायला पाहिजे अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 31, 2021
‘हे असे व्हायरस वेळीच ठेचायला हवेत, उल्लंघन करणाऱ्या स्टंटबाज नेत्यांवर कारवाई व्हावी’
पुढं बोलताना अमेय खोपकर म्हणाले होते की, हा प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे व्हायरस वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी देखील खोपकर यांनी केली होती.
दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाविरोधात इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. जलील यांनी 31 मार्चला आंदोलन करणार अशी घोषणाही केली होती.
‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’
एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…
परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा
भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान
शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना राज्यात ‘No Entry’ ! ठाकरे सरकार आणणार स्वतंत्र कायदा
…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य