नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसने congress स्वत:चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म INC TV यूब्यूबरवर लाँच केले आहे. मेन स्ट्रिम मीडियात पक्षपाती राहिला असल्याची टीका काँग्रेसवर करण्यात येत होती. त्यामुळे काँग्रेसची विचारधारा आणि काँग्रेसन केलेले काम थेट जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी यूट्यूबर एका चॅनलची सुरुवात करण्यात आले आहे. पक्षाचे संदेश या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवले जाणार असल्याचे काँग्रेसचे congress प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले. भाजपचे पूर्वीपासून युट्युबवर चॅनल असून भाजपचे 36 लाखांपेक्षा अधिक सबस्क्रिबशन्स आहेत.
‘शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्त्यांचे, इतरांचे काय?’, निलेश राणेंचा सवाल
काँग्रेसच्या congress मुख्यालयात बोलताना रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, INC TV यूट्यूब चॅनल 24 एप्रिलपासून ऑन एअर होईल. राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त याचा शुभारंभ करण्यात आला आहे. दिवसातील किमान आठ तास हे यूट्यूब चॅनल लाईव्ह असणार आहे. यूट्यूबच्या लाँचिंगवेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी मल्लीकार्जुन खरगे, एनएसयूआय अध्यक्ष निरज कुंदन आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव उपस्थित होत्या.
https://twitter.com/i/broadcasts/1djxXqnnyEOKZ?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1382218976348934144%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fdesh%2Fcongress-launches-inc-tv-its-own-digital-media-platform-430114
पत्रकार परिषदेत बोलताना मल्लीकार्जुन खरगे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही वाटायचे की भारतात पत्रकारिता म्हणजे व्यवसाय झाला आहे. भाजप त्यांचा विश्वास खरं ठरवताना दिसून येत आहे. भाजपच्या शासन काळात दलितांवर अत्याचार वाढले. दर 11 मिनिटाला देशात दलितांवर हल्ले होत आहेत. देशात सत्य लपवण्याचा प्रयत्न होत आहे. देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. काँग्रेस INC TV च्या माध्यमातून सत्य देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.
नाना पटोले म्हणाले, ‘मोदी लोकांना म्हणताहेत मास्क घाला अन् स्वत: मात्र…’
फडणवीसांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे’
महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, उत्तर प्रदेशाकडेही पहा; रोहित पवारांनी विरोधकांना सुनावलं
पंढरपूरमध्ये बरसले पडळकर आणि दरेकर; म्हणाले – ‘आघाडी सरकार पांढर्या पायाचे, बलात्कारी’
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘…याचा परिणाम संपूर्ण देशावरच होईल’
Raju Shetty : ‘जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा, लॉकडाऊन लावू नका’
अनिल देशमुख यांना CBI चं समन्स, 14 एप्रिलला चौकशी
कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…
चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला Lockdown वर सुचवला ‘उपाय’, म्हणाले ; ‘लॉकडाऊनऐवजी…’