नवी मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Devendra Fadnavis | माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप सरकारने (BJP Government) प्राधान्य दिले. उर्वरित प्रश्नही सत्ता आली असती तर सोडवले असते. पुन्हा आम्हालाच संधी मिळणार असून कामगारांचे सर्व प्रश्न सोडवण्यात येतील असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.
नवी मुंबई (Navi Mumbai) येथे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते.
फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, भाजप सरकारच्या काळात कामगारांच्या प्रश्नांवर कधीही राजकारण केले गेले नाही.
कामगार हिताचे निर्णय घेण्यात आले. अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली. काही प्रश्न उरले होते.
सत्ता असती तर तेही सोडवले गेले असते.
केंद्र सरकारशी संबंधित माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच दिल्लीमध्ये बैठक आयोजित केली जाईल,
असे केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले आहे.
त्या बैठकीत सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले.
या पोर्टलमध्ये आतापर्यंत 1 कोटी 60 लाख नागरिकांची नोंदणी झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार गणेश नाईक (MLA Ganesh Naik), मंदा म्हात्रे (Manda Mhatre), शशिकांत शिंदे (shashikant shinde), प्रसाद लाड (Prasad Lad), निरंजन डावखरे (niranjan davkhare) व इतर मान्यवर उपस्थित होते.
Web Titel :- Devendra Fadnavis | BJP will get another chance in maharashtra former chief minister devendra fadnavis
- Pune Crime | लग्नाच्या 3 महिन्यानंतर देखील पत्नी ‘हात’ लावू देत नव्हती, पतीच्या हाती लागला मोबाईल अन् ‘लगट’ करतेवेळीचा ‘पर्दाफाश’
- Home Remedies of Stress Relief | स्ट्रेसमुळे प्रभावित होत असेल वैयक्तिक जीवन, तर ‘हे’ 5 घरगुती उपाय उपयोगी ठरतील; जाणून घ्या
- Earn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहीना होईल 1 लाखापेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कसा?