मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवार (दि.14) रात्री आठ पासून राज्यात लॉकडाऊन जाहिर केला आहे. लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी पॅकेजची घोषणा केली आहे. सरकारकडून जाहीर कण्यात आलेल्या निर्बंध आणि आर्थिक मदतीवरुन देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने जाहीर केलेले पॅकेज ही निव्वळ धूळफेक असल्याचे फडणवीस Devendra Fadnavis यांनी म्हटले आहे, ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स,रेमडेसिवीर,ऑक्सिजन,ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे.
तरच रूग्णांची परवड थांबेल.
(1/4)#CoronaInMaharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 13, 2021
देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, कडक निर्बंध लावणार असाल तर विविध घटकांना मदत केली पाहिजे. मात्र, सरकारने जाहीर केलेले हे पॅकेज निव्वळ धुळफेक आहे. कारण 3300 कोटींची तरतूद करोनासंदर्भात सांगण्यात आली आहे. ती नियमित बजेटमधील तरतूद आहे जी वर्षभरात खर्च होणार आहे. त्यामुळे सध्या वाढणाऱ्या कोरोनासाठी ही तरतूद नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कोविड प्रतिबंधासाठी जो 3300 कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो बजेट घोषणेसारखा न ठेवता, तत्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी, तत्काळ विनियोग तत्त्वावर वापरला गेला पाहिजे. तशी परवानगी सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजे.
(2/4)#CoronaInMaharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 13, 2021
कोणाला कोणती मदत केली
सरकार किती बेड्स, व्हेंटिलेटर वाढवणार याची माहिती देईल असे वाटले होते. अनेक घटकांना सरकारने मदत केलेली नाही. शेतकरी, मजूर, बारा बलुतेदार, केशकर्तनालय, लहान उद्योग कोणालाही कोणती मदत केलेली नाही. सरकारकडून दिशाभूल करण्यात आली आहे. वृद्धापकाळ, श्रावणबाळ या केंद्र सरकारच्या योजना आहेत. यामध्ये सरकार अतिरिक्त 1000 रुपये देईल असे वाटले होते. एकही नवीन पैसा मिळत नसून आगाऊ पैसा देत आहेत, असं म्हणत आदिवासींना दोन हजार रुपये खावटी अनुदान म्हणजेच तोंडाला पानं पुसण्यासारखं असल्याचे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी केवळ काहीच घटकांचा विचार केला. पण,बहुतांश घटकांचा विचारच केलेला नाही. बारा बलुतेदार, छोटे व्यवसायी, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजना नाही.
खरे तर हाच रोजगारातील मोठा घटक आहे. त्यांना सामावून घेण्याबाबत तत्काळ निर्णय घ्या.
(3/4)#coronainmaharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 13, 2021
व्यवस्थापन करण्यात सरकार अपयशी
सरकारने पदविक्रेत्यांना मदत करणार असल्याचे सांगितले होते. नोंदणीकृत असा उल्लेख केल्याने याचा उपयोग केवळ मुंबई आणि ठाण्यातील पदविक्रेत्यांना होणार आहे. तसेच रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना परवानगी दिली आहे. संचारबंदी लावल्याने त्यांच्याकडे कोण येणार ? पार्सल सेवा देण्याची त्यांच्याकडे कोणती व्यवस्था आहे. असती तर त्यांनी हॉटेलच उघडले असतं. अशी टीका फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली. याशिवाय ऑक्सिजनचे व्यवस्थापन करण्यात सरकारला अपयश आले असून त्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी यासंदर्भातील सवलती राज्य सरकारने जाहीर करायला हव्या होत्या.
पण, तसे झालेले दिसत नाही.
हे निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावेत, अशी आमची आग्रही मागणी आहे.
(4/4)#CoronaInMaharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 13, 2021
मुंबई-पुण्याबाहेर महाराष्ट्र आहे
मुंबई आणि पुणे ही आपली प्रमुख शहरे आहेत. मात्र, मुंबई आणि पुणे शहराबाहेर देखील महाराष्ट्र आहे हे सरकारला माहीत नाही. त्यामुळे नागपूर, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणची व्यवस्था वाढवण्याच्या संदर्भात सरकारकडून कोणतीच कृती होताना दिसत नाही. मागील वेळी नागपूरला कोणतीही व्यवस्था केली नाही आणि आजही केली नाही. नागपूरची व्यवस्था वाईट झाली असल्याने मी या ठिकाणी आलो आहे. शक्य हाेईल तितकी मदत मी याठिकाणी करणार आहे. पण सरकार कोणतीही मदत किंवा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याची टीका फडणवीस Devendra Fadnavis यांनी केली.
अनिल देशमुख यांना CBI चं समन्स, 14 एप्रिलला चौकशी
कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…
बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांवर नियंत्रण आणावं, महाकुंभमेळाव्यातील गर्दीवरून संजय राऊतांचे विधान
सत्ताबदलाबाबत फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘…तर आमच्या शुभेच्छा’