मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात १०० कोटींच्या वसुलीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. या आरोपांनंतर अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटींची खंडणी वसूल करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे केला आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. या आरोपानंतर आणि अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच भेट झाली.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी १ तासभर हि बैठक सुरु होती. आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. परमबीर सिंह यांचं पत्र तसंच फोन टॅपिंग प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपांनंतर मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक असणार आहे. यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जाईल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली याची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही आहे. तसेच दुसरीकडे परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर राज्यात विरोधी पक्ष आक्रमक झाला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मौन बाळगले आहे.
Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; जाणून घ्या पुणे-मुंबईतील आजचा भाव
मुख्यमंत्र्यांनी मौन का बाळगलंय? संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले….
जय राऊत यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांना मुख्यमंत्री फोन टॅपिंग प्रकरणावर कोणतेही भाष्य करत नसल्याचे विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, “आम्ही सगळे तानाजी मालुसरे, बाजीप्रभूंचे वंशज आहेत. आमचे जे प्रमुख आहेत त्यांच्यासाठी लढणं आमचं काम आहे. ते मुख्यमंत्री आहेत त्यांना त्यांचं काम करु द्या, आम्ही येथे सगळ्या लढाया लढण्यासाठी सक्षम आहोत”. “मुख्यमंत्री योग्य वेळी समोर येतील आणि जेव्हा ते समोर येतील तेव्हा या तोफा, बॉम्ब यांच्यात काही दम नाही हे कळेल,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण… ; निलेश राणेंची टीका
ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका
धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण
‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’
फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल