मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे दिसत नाही. त्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागणार असल्याचे सूचक विधान महसूलमंत्री बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी केले आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात विकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व काही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नाईट कर्फ्यूसारखी विविध निर्बंध लावण्यात आली आहेत. तरीही रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे दिसत नाही. या सर्व परिस्थितीवरून आता राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat म्हणाले, ‘राज्यात वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. आज किंवा उद्या मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील. मुख्यमंत्री ठाकरे याबाबत अंतिम एसओपी करत आहेत. गरीब लोकांना काय दिलासा देता येईल याबाबत सरकारकडून विचार केला जात आहे’.
रेमडेसीविरसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने भाजप नेत्याचा नंबर केला शेअर, पोलिसात तक्रार
तसेच मागील वर्ष आणि हे वर्षही कोरोनामध्ये गेले आहे. राज्य संकटात आहे. राजकारणात चढउतार होत असतात पण राजकारण हे लोकांसाठी करत असतो. कोरोनाचे संकट दूर होवो, असेही ते म्हणाले.
पुणे जिल्हयात कपांऊडर 2 वर्षापासून चालवत होता मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल
दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाऊनने काही होणार नाही. संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला प्रत्येक पाऊल उचलणे गरजेचे आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा आहे, असे कॅबिनेटमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी विधान केले आहे.
देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर घणाघात, केला ठाकरे सरकारवर ‘हा’ गंभीर आरोप
‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला
‘प्राण जाये पर वचन न जाये’, असं उद्धव ठाकरेंचं कार्य’, मुख्यमंत्र्यांची पाठराखण
..हे तर ‘महावसूली’ सरकार अन् ‘जिथं जाऊ तिथं खाऊ’ ही मंत्र्यांची कामे : फडणवीस
‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला
…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल
‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात
पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)
भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा