मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरस देशभरात थैमान घालत आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावरून महाराष्ट्र काँग्रेसने (congress) ट्विट करत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते’, असे काँग्रेसने म्हटले आहे.
Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’
"कोरोनावरील इतरही लसींना मान्यता द्यावी" हा सल्ला राहुल गांधींनी फार आधीच दिला होता. मात्र लसीअभावी लसीकरण केंद्र बंद करायची वेळ आल्यावर मोदी सरकारने इतर लसींना मान्यता दिली.
जर हा निर्णय आधीच घेतला असता तर कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते!#VisionaryRahul pic.twitter.com/IAMy6QnJGG— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 16, 2021
देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरणही सुरु झाले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा जाणवत असल्याचे समोर आले होते. त्यावरूनच आता महाराष्ट्र काँग्रेसने congress ट्विट करून निशाणा साधला. त्यामध्ये म्हटले, की ‘कोरोनावरील इतरही लसींना मान्यता द्यावी’ हा सल्ला राहुल गांधींनी फार आधीच दिला होता. मात्र, लसीअभावी लसीकरण केंद्र बंद करायची वेळ आल्यावर मोदी सरकारने इतर लसींना मान्यता दिली. जर हा निर्णय आधीच घेतला असता तर कोरोनाची दुसरी लाटही आली नसती व लोकांचे जीवही गेले नसते’.
दरम्यान, देशात कोरोनाची भयानक दुसरी लाट केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे आहे आणि स्थलांतरित मजूर पुन्हा एकदा गावाकडे परतण्यासाठी हतबल झाले आहेत. सर्वसमान्यांचे जीवन व देशाची अर्थव्यवस्था दोन्हींसाठी लसीकरण वाढवण्यासोबतच त्यांच्या हातात पैसा देणेही आवश्यक आहे. मापदंडानुसार, परदेशी लसींना त्वरीत मान्यता द्यावी, असेही काँग्रेसचे congress वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी यापूर्वीच म्हटले होते.
100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी
चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’