मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने होळी आणि धुलिवंदनाच्या सणावर लादलेल्या निर्बंधांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. सार्वजनिक ठीकाणी सण साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आल्याने भाजपने आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपचे नेते अतुल भातखलकर atul bhatkhalkar आणि राम कदम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी पारंपरिक वाद्यावर ठेका धरत साजरी केली होळी ! (व्हिडीओ)
अतुल भातखळकर atul bhatkhalkar यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. शब-ए-बारातला नियमांसह परवानगी पण होळीच्या सणावर कडक निर्बंध, ठाकरे सरकारच्या या हिंदू विरोधी फतव्याला भाजपचा पूर्ण विरोध असून मुंबईतील हिंदू बांधवांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत आपापल्या श्रद्धेनुसार होळी साजरी करावी, असे आवाहन अतुल भातखळकर यांनी केले.
शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण
याशिवाय, मागील वर्षापासून कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू सणांवर निर्बंध लादणाऱ्या ठाकरे सरकारने इतर धर्मियांच्या उत्सवांना खुली सूट दिली. ठाकरे सरकारच्या अशा हिंदू विरोधी कृत्यांचा जाहीर निषेध करुन आम्ही होळी साजरी करणारचं, ठाकरे सरकारमध्ये हिंम्मत असले तर त्यांनी आमच्यावर कारवाई करुन दाखवावी, असे आव्हान भातखळकर यांनी दिले आहे.
शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण
भातखळकर atul bhatkhalkar पुढे म्हणाले, महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे की मुस्लीम लीगचं ? शब्बे बारातला परवानगी देऊन ठाकरे सरकारनं होळीवर बंदी घातली आहे. हा हिंदू विरोध खपवून घेतला जाणार नाही. हिंदूंनो जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा. चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार, असेही ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? शब्बे बारातला परवानगी देऊन ठाकरे सरकारने होळीवर बंदी घातली आहे. हा हिंदूविरोध खपवून घेणार नाही. हिंदूनो जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा,सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा. चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार. pic.twitter.com/WVDfdCJORw
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 28, 2021
होळी घरात पेटवायची का ?
अतुल भातखळकर यांनी टीका केल्यानंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हिंदू विरोधी ठाकरे सरकार म्हणतंय होळी घराच्या दारासमोर पेटवायची नाही. मग काय घरात पेटवायची ? लोक रंगपंचमी समजू शकता गर्दी होईल. एकमेकांना स्पर्श होईल मात्र नियमांचे पालन करत होळी पेटवली आणि हिंदू बांधवांनी आपला सण साजरा केला, तर त्याला ठाकरे सरकारचा विरोध का ? अन्य धर्मांना तातडीने परवानगी दिली जाते ते काय कोविडचे नातेवाईक लागतात की वसुली सरकारचे ? असा सवाल राम कदम यांनी केला आहे.
हिंदू विरोधी #ठाकरेसरकार म्हणतेय #होळी घराच्या दारा समोर पेटवायची नाही.
तर मग काय घरात पेटवायची ?
लोक #रंगपंचमी समजू शकतात गर्दी होईल. एकमेकांना स्पर्श होईल मात्र नियमांचे पालन करत $होळी पेटवली आणी #हिंदू बांधवांनी आपला सण साजरा केला तर त्याला ठाकरे सरकारचा विरोध का?
— Ram Kadam (@ramkadam) March 28, 2021
Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही
Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’
Sanjay Raut : अनिल देशमुखांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले
होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा
Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर
PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली
‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका