सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राज्यातील आमची महाविकास आघाडी mahavikas aghadi आणि सरकार भक्कम आहे. पुढील 20 ते 25 वर्षे आम्हाला धोका नाही असं वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केलं आहे. सर्वांनाच पक्ष विस्ताराचा अधिकार आहे. शिवाय आम्ही कायमचे एकत्र राहणार आहोत असंही नाही. तीन पक्षांच्या नेत्यांचे एकमत आहे, तो पर्यंत आघाडी कायम राहिल. परंतु यात मतभेद होतील असं वागू आणि बोलू नये असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं.
1 एप्रिलपासून कामाचे तास, वेतन बदलणार; जाणून घ्या सरकारचा प्लॅन
सध्या राज्यातील महाविकास आघाडीत mahavikas aghadi वाझे प्रकरण, रश्मी शुक्ला, परमबीर सिंग प्रकरणावरून अस्वस्थता आहे. याबद्दल बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सज्जन आणि सोज्वळ व्यक्तिमत्व आहे. अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो असं खुद्द ठाकरे यांनीच सांगितलं. आम्ही अनुभवी मंत्र्याला सल्ला देऊच. पण तो ऐकायचा की, नाही कशाचे आधारे आपलं मत बनवायचं, हा त्यांचाच अधिकार असेल असंही ते म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…
परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा
भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान
शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना राज्यात ‘No Entry’ ! ठाकरे सरकार आणणार स्वतंत्र कायदा
…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य