भोपाळ : MP Sudhir Gupta on Amir Khan | मध्य प्रदेशातील भाजपाचा खासदार सुधीर गुप्ता यांने बॉलीवुड अभिनेता आमिर खान बाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. Sudhir Gupta ने म्हटले आहे की, देशातील वाढत्या लोकसंख्येच्या पाठीमागे Amir Khan सारख्या लोकांचा हात आहे. Amir Khan सारखे लोक भारताच्या लोकसंख्येचे संतुलन बिघडवतात. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त पत्रकारांशी बोलताना मंदसौर मतदार संघातील भाजपाच्या या खासदारने म्हटले की, भारताने वाढणारी लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी कठोर आणि आवश्यक पावले उचलली पाहिजेत.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update
आजोबाच्या वयात तिसरी पत्नी शोधतोय
देशात वाढणारी लोकांसख्या नियंत्रित करण्याबाबत बोलताना Sudhir Gupta ने म्हटले की, दुर्दैव्याने आमिर खान देशातील लोकांसाठी हिरो आहे, त्याने Reena Datta ला सोडले, तिच्यापासून आमिरला दोन मुले आहेत, नंतर आमिरने Kiran Rao रावसोबत लग्न केले आणि तिच्यापासून एक मुल आहे. जेव्हा आजोबा बनण्याचे वय आहे, तेव्हा तो तिसरी पत्नी शोधतोय. एवढ्यावरच न थांबता सुधीर गुप्ताने म्हटले, असा संदेश एखादा हिरो देतो का. जगभरातील लोक म्हणतात की अंडी विकण्याशिवाय यांच्याकडे जास्त बुद्धी नाही, त्याने एवढे जरी केले तरी जास्त बरे आहे.
भारताच्या हिरोला काय संदेश द्यायचा आहे
सुधीर गुप्ताने म्हटले की, पाकिस्तानने दुर्दैवी फाळणीनंतर अशाप्रकारच्या लोकांना देशाच्या बाहेर काढले, परंतु आपली जमीन परत केली नाही. अखेर आमिर खान सारखे लोक काय संदेश देतात, तो हिरो आहे, भारतासाठी जगाला त्याला कोणता संदेश द्यायचा आहे. जे लोक त्याला अंडी विकणारा म्हणतात ते कदाचित योग्य बोलत आहेत.
MP Sudhir Gupta ने म्हटले, जर मागे वळून पाहिले तर जी फाळणी झाली होती त्यामध्ये
भारताची जमीन जास्त गेली होती, पाकिस्तानची लोकसंख्या कमी असूनही. परंतु जेव्हा त्यांनी धक्के
देऊन परत पाठवले तेव्हा त्या बेशरम्यांनी त्या बदल्यात जमीन परत केली नाही.
अंडी विकण्यापेक्षा जास्त अक्कल नाही
गुप्ताने म्हटले, भारतात आमिर खान लोकांसाठी हिरो आहे. पहिली पत्नी रिना दत्ता आपल्या दोन
मुलांसोबत आहे, दुसरी पत्नी किरण राव एका मुलासोबत कुठे भटकणार याची चिंता नाही. परंतु
आजोबा आमिर तिसरी शोधण्याच्या मागे लागला आहे. जग म्हणत होते की यास अंडी विकण्यापेक्षा
जास्त अक्कल नाही, इतके केले तरी ठिक आहे. भारताच्या लोकसंख्येला असंतुलित करण्यात
आमिर खानसारख्या लोकांचा सहभाग आहे, हे दुर्दैव्य आहे.
8 मुलांच्या आईच्या वक्तव्याचा उल्लेख
फरीदाबादची महिला क्रिस्टीनचा उल्लेख करत सुधीर गुप्ता यांनी म्हटले की, जर दुर्दैवाने पाहिले तर
फरीदाबादची एक महिला जी ब्रेस्ट कॅन्सरने पीडित होती, तिने आपल्या आठव्या आणि शेवटच्या
मुलाला मृत्यूच्यापूर्वी जन्म दिला. तिने वक्तव्य केले होते की, मी आनंदी आहे की मी जगाला माझ्या
इश्वाराचा दिव्य संदेश पोहचवण्यासाठी आठ मुले देऊ शकले, मग हे संदेश कोणते आहेत, यासाठी
भारताला कठोर व्हावे लागेल, विकासवादी विचार हवे असतील तर लोकसंख्येवर नियंत्रण हवे. ज्या
लोकांचे हेतू कुत्सित आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.
Web Titel : MP Sudhir Gupta on Amir Khan | BJP MP says Actor like Amir Khan are responsible of disturbing Indian population.
- Pune News | पुणे 4 वाजता लॉक झालंच पाहिजे, अन्यथा कडक कारवाई करा, अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना
- Thackeray government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! सरकारी कर्मचारी व अधिकार्यांच्या सर्वसाधारण बदल्या 31 जुलैपर्यंत; पण 15 टक्केच
- Pankaja Munde । एकनाथ खडसेंच्या ईडी चौकशीवरून भाजप नेत्या पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- Bhosari MIDC Land Scam | एकनाथ खडसे ED च्या चौकशीला घाबरत नाहीत, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा भाजपला इशारा
- Chitra Wagh | ‘आम्हलाही आरे ला कारे करण्याची भाषा येते’, चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना दिली ‘वॉर्निंग’ (व्हिडीओ)
- Cabinet Minister Narayan Rane । ‘अन्याय सहन न करणारा स्वभाव असल्यानेच नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले; पवारांनी काढलं होतं गौरवोद्गार