मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – महाराष्ट्रात अनेक प्रकरणावरून राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आलं आहे. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या फोन टॅप प्रकरणात माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला rashmi shukla यांना चौकशीला बोलावण्यासाठी पोलिसांनी समन्स बजावलं आहे. मात्र, रश्मी शुक्ला rashmi shukla यांनी यावरून हैद्रराबाद उच्च न्यायालयात धाव घेत चौकशीला स्थगिती देण्याचा मागणी अर्ज दाखल केला आहे.
फोन टॅप प्रकरणावरून जेष्ठ IPS ऑफिसर रश्मी शुक्ला rashmi shukla यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, शुक्ला यांनी कोरोनाच्या परिस्थितीमुळे येणे शक्य नसल्याचे सांगत त्या टाळाटाळ करत होत्या. तुम्ही प्रश्नावली ईमेलद्वारे पाठवावी, त्याला उत्तर देते, असं शुक्ला यांनी समन्सला उत्तर दिले होते. या एक समन्स नंतर आणखी एकदा ‘समन्स दिला गेला होता. या समन्सवरून शुक्ला यांनी म्हटले की, आपल्याला चौकशीसाठी समन्स बजवण्यात येत असल्याने चौकशी अधिकारी आपला छळ करत आहे, अशाप्रकारचा गंभीर आरोप शुक्ला यांनी केलाय. तसेच शुक्ला यांनी हैद्राबाद उच्च न्यायालयात धाव घेत २९ एप्रिलला अशा ‘प्रकरणावरून याचिका दाखल केली आहे. तर शुक्ला rashmi shukla यांच्या याचिकेवरून ६ मे ला सुनावणी होणार आहे.
Immunity Boost करण्यासाठी प्या एलोवेराचा ज्यूस, होतील 4 जबरदस्त फायदे सोबत !
काय आहेत शुक्ला यांच्यावरील आरोप?
ठाकरे सरकारवर निशाणा साधत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलात बदल्या करण्यासाठी अनेक फोन कॉल केले गेले होते, असा गंभीर आरोप केला होता. यावरून फडणवीस यांनी रिपोर्ट वाचून दाखवत याचा पुरावा केंद्रीय गृहसचिवांकडे सुपूर्द केला होता. यावरून राज्य सरकारने या प्रकरणाबाबत चौकशी केली असता, वरिष्ठ आयपीएस रश्मी शुक्ला rashmi shukla यांच्याकडून माहिती लीक झाल्याचे समोर आले. तसेच शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. परंतु, त्याचा गैरवापर केला गेला. तर शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणामध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी त्यांनी ही रीतसर परवानगी घेतली होती. मात्र हे करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोनही टॅप केले आहे, याबाबतचा आरोप काही मंत्र्यांनी केला होता. तर शुक्ला rashmi shukla या भाजपसाठी काम करत आहेत असे आरोप सुद्धा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी केला होता.
Chandrakant Patil : ‘ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; मुख्यमंत्री ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत’
…अन् आता निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले?
Devendra Fadanvis : …म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त लसीकरण
इस्रायलमध्ये बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरी; ४४ जणांच्या मृत्यूची शक्यता
‘खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजनांचा शेलक्या शब्दांत खडसेंना टोला
ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा