IMPIMP

नारायण राणे म्हणाले, ‘ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार हा एककलमी धंदा’

by Team Deccan Express
Narayan Rane | narayan rane to appear in alibag court case about objectionable words against ex cm uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – दिवाळखोरीचे सरकार जनतेला वाचवू शकत नाही. जनाची नाही केवळ मनाची बाळगा. मुख्यमंत्री फक्त बाधित आणि मृतांची संख्या जाहीर करतात. त्यामुळे ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार हा एककलमी धंदा आहे, असा गंभीर आरोप भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे narayan rane यांनी केला आहे. तसेच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे, असेही ते म्हणाले.

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक निर्बंध लावले आहेत. तसेच 1 मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यावरून नारायण राणे narayan rane यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बुद्धिमत्ता योग्य मार्गदर्शक नाही. प्रत्येकवेळी केंद्राकडे मदत का मागत असता? त्यांची यादी वाचण्यापेक्षा ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करा. राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे.’

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

दरम्यान, राज्यात संचारबंदीचा परिणाम होताना काहीच दिसत नाही. लॉकाडाऊनच्या भीतीने नागरिक बाजारपेठेत गर्दी करत आहेत. त्यामुळे बाजारपेठांमधील गर्दीचा विचार सरकारने करायला हवा. व्यवसाय बंद असताना जीएसटी का सुरू आहे? लॉकडाऊन उठवा दुकाने सुरू करा, गोरगरिबांचा विचार करा, असेही नारायण राणे narayan rane म्हणाले.

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

दीड हजारात काय भागणार?
राज्य सरकारने रिक्षाचालकांना दीड हजाराची मदत दिली. त्यातून पूर्ण कुटुंबाचे पालनपोषण होणार का? 5 जणांच्या कुटुंबाचं महिना दीड हजारात कसं भागवणार? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच अर्थसंकल्पात विकासाला पैसा दिलेला नाही. अर्थमंत्री फक्त आकडेवारी सादर करत आहेत, असेही ते म्हणाले.

Also Read :

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

Related Posts