पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यातील अस्थिर वातावरणातून काहीना बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्वच राज्याला या सद्यस्थितीतून बाहेर काढू शकेल, असे माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील narendra patil यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यापासून मराठा आणि माथाडी कामगारांना न्याय दिलेला नाही, असेही ते म्हणाले.
बारामती येथे आयोजित एका उद्घाटन समारंभात नरेंद्र पाटील narendra patil भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने साताऱ्याची जागा शिवसेनेकडे मागितली होती. मात्र, शिवसेनेने ती दिली नाही. त्यामुळे मला शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मला नेहमीच संधी मिळाली. मात्र, महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यापासून मराठा आणि माथाडी कामगारांना न्याय दिलेला नाही. सध्याचे वातावरण पाहता मला लवकरच कर्तबगार मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळेल अशी माझी इच्छा आहे.
पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने शरद पवारांना पुन्हा ब्रीज कँडीत दाखल
दरम्यान, मध्यावधी निवडणुका न घेता स्थिर सरकार द्यायचे असेल तर फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यांना आता कोण मदत करेल हे शपथविधी झाल्यावरच समजेल, असेही ते म्हणाले. तसेच राज्यात धनंजय मुंडे, अनिल देशमुख यांच्यासारखी संबंधित प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे राज्यातील अस्थिर वातावरणातून काहीना बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. फडणवीस यांच्यासारखे नेतृत्वच राज्याला सद्यस्थितीतून बाहेर काढू शकले, असेही ते म्हणाले.
अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार
चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट
केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’
शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’