पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. प्रचाराच्या शेटच्या दिवशी भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी सभा घेऊन प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केला. काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर gopichand padalkar यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रवादीनं गोरगरीब समाजाच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला अशा शब्दांत त्यांनी आरोप केले.
गोपीचंद पडळकर gopichand padalkar यांनी प्रचार सभेत बोलताना म्हणाले, ज्यांनी राज्यातील घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं सुरु आहेत. नियतीचा न्याय इथेच पहायला मिळतो. मेंढ्याचे नेतृत्व कधी लांडग्यांकडे नसते. राष्ट्रवादी खूप हुशार आहे. त्यामुळे गरीब तोंडाचा गृहमंत्री बघतात. त्यामुळे चिल्लर त्याला आणि नोटा मात्र बारामतीला अशी अवस्था असल्याची टीका पडळकर यांनी केली.
अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’
पडळकर gopichand padalkar यांनी गृहमंत्री पदावरुन बोलताना म्हटले, सचिन वाझे प्रकरणानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा देताच जयंत पाटील खुलले होते,असा टोला त्यांनी जयंत पाटलांना लगावला. अखेर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद सोपवण्यात आले. राज्यात जे लोक सीबीआयला येऊ देणार नाही असे म्हणत होते त्यांनाच सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागत असल्याचे पडळकर म्हणाले.
Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’
100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी
चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’