मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी हप्ता वसुलीचा गंभीर आरोप केला होता. या कथित आरोपामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आता हे प्रकरण CBI कडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे देशमुखांना अखेर सोमवारी (दि. 5) राजीनामा द्यावा लागला आहे. राजीनाम्यानंतर देशमुखांनी थेट दिल्ली गाठली असून हायकोर्टाच्या आदेशाला ते सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे. त्यासाठी रात्री त्यांनी काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.
अनिल देशमुख सध्या दिल्लीत असले तरी मंगळवारी (दि.6) सीबीआयचे CBI अधिकारी मुंबईत दाखल होत आहेत. परमबीर सिंग यांनी देशमुखांवर जे 100 कोटी वसुली करण्याचे आरोप लावले आहेत. त्याचा तपास करण्यासाठी सीबीआयची टीम मुंबईत येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 15 दिवसांत 100 कोटी वसुलीच्या आरोपाची प्राथमिक चौकशी करण्यात येईल आणि या चौकशीत जर काही तथ्य आढळल असेल तर सीबीआयला FIR नोंद करण्याच्या सूचनाही हायकोर्टाने दिल्या आहेत. दरम्यान अनिल देशमुखांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला तर त्यांच्याजागी दिलीप वळसे पाटील यांना गृहखात्याचा कारभार सोपवला आहे.
‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’
जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन
‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’
अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण
पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !
शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’