मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील मंत्रिपदास लायक नसून, कामचुकार आहेत. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद काढून रात्री साडेनऊपर्यंत विधानसभा चालवण्यास मोकळे करावे. पवारसाहेब, आपण शेतकरी farmer हितासाठी दक्ष असाल त्यामुळेच हे मंत्री नेमलेले असतील तर त्यांना ताबडतोब आदेश द्यावेत. तसे जर आपण केले नाही तर आपणाकडे अर्ज करण्याची इच्छा होणार नाही, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिले आहे.
राज्यात Lockdown लागणार का ? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले ‘हे’ संकेत
जळगाव जागृत जनमंचचे अधिकारी आणि एका शेतकऱ्याने हे पत्र लिहिले आहे. यामध्ये त्याने विविध मुद्यांवर लक्ष वेधले आहे. शरद पवार यांना ‘जाणता राजा’ म्हटले जाते. शेतकऱ्यांसाठी दिवस-रात्र झटणारा एकमेव नेता म्हणूनही त्यांचे देशात नावलौकिक आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही स्थानिक नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवत नाहीत. तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यात चालढकलपणा करत आहेत. आपण शेतकरी farmer हिताबाबत बोलता. पण आपले आमदार आणि मंत्री हे शेतकरी farmer विरोधात काम करत आहेत, असाच आमचा अनुभव आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्याकडे आता सत्ता आली आहे. मात्र, एकाही शेतकऱ्याला त्यांनी अनुदान मिळू दिले नाही. विविध कारणे सांगून त्यांनी अनुदान नाकारले, असेही या पत्रात म्हटले आहे.
गुलाबराव देवकर, जयंत पाटलांचेही नाव
आमदार पाटील आणि अमळनेर बाजार समितीच्या प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी शेतकऱ्यांना अनुदान मिळू देण्यात विरोध केला. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन, गुलाबराव पाटील यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे. विषयही सांगितला पण ते शेतकरी हिताच्या मानसिकतेत आढळून आले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार
चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट
केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’
शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’