IMPIMP

‘ठाकरे सरकार रामाचे नाही, भिमाचे नाही आणि कामाचेही नाही’

by sikandershaikh
ramdas athawale uddhav thackeray

पालघर : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)येथील व्रिकमगडच्या दिवेकर वाडी येथे आयोजित आदिवासी बहुजन मेळाव्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (ramdas athawale) उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आपल्या खास शैलीत जोरदार टीका केला. उद्धवजींचे सरकार नाही रामाचे, नाही भिमाचे, नाही काही कामाचे, अशी बोचरी टीका आठवले यांनी केली.

जातीनिहाय जनगणना करा

याप्रसंगी आठवले (ramdas athawale) यांनी मागणी केली की, मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या आणि जातीनिहाय जनगणना करा. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही यासंदर्भात चर्चा केली आहे. मराठा समाजाला एससी, एसटी आणि ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देऊन नये. त्यांना स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्यावे. सवर्ण समाजातील गरिबांना 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा केंद्र सरकारने केला. त्याला जोड देऊन देशातील मराठा, राजपूत आदी क्षत्रिय समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा संसदेत करावा. आगामी जणगणना जातीवर आधारित करावी. जातीनिहाय जनगणनेमुळे जातीयता वाढणार नाही, आणि प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार न्याय वाटा मिळेल.

आघाडी सरकार कामाचे नाही

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही कामाचे नाही.
पालघर तालुक्यात आठ तालुके दुर्गम असून त्यापैकी विक्रमगड तालुका आहे.
येथे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे.
त्यातच मनरेगाचे काम केलेल्या आदिवासींना अजून राज्य सरकारने वेतन दिलेले नाही. हे योग्य नाही.
आरपीआय आणि कुणबी सेना एकत्र आली तर भविष्यात राज्यात मोठी सामाजिक आणि राजकीय क्रांती होईल.
पालघर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आदिवासी भवन उभारण्याची मागणी केली जात आहे.
ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन, असे अश्वास आठवले यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या FB लाईव्हमधील अत्यंत ’सत्य वाक्य’, भाजपा नेत्यानं काढला ‘चिमटा’

Related Posts