बेळगाव : वृत्तसंस्था – बेळगाव येथील कणबर्गी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर rupali chakankar उपस्थित होत्या. त्यावेळी आयोजित सभेत बोलताना म्हणाल्या, सीमालढ्यातील हुतात्मांना आदरांजली वाहण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. यामुळे मराठी माणसांचा विरोधक म्हणून विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा द्यावा. अशी जोरदार टीका चाकणकर rupali chakankar यांनी केली आहे.
रुपाली चाकणकर rupali chakankar म्हणाल्या, हिंडलगे येथे महाराष्ट्रासाठी हुतात्म पत्करले त्यांचे स्मारक आहे. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन आदरांजली वाहणे आवश्यक होते. परंतु, त्याच ठिकाणी भाजपच्या व्यासपीठावरून मराठी माणसांच्या विरोधात भाषण केले. प्रत्येक वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसांच्या विरोधात भूमिका घेतली आहे हे जनतेला माहीत आहे. असे चाकणकर यांनी म्हटले आहे.
पुढे त्या म्हणाल्या, भाजपची सत्ता असताना तुमचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील हे एकदाही बेळगावात आले नाहीत. यामुळे मराठी माणसांत तुमच्याबद्दल चीड आहे. असे देखील त्या म्हणाल्या, या सभेवेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, उमेदवार शुभम शेळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…
अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’
Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’
100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी
चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’