मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताबदलाबाबत भाष्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार शिवसेना नेते खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी घेतला. ‘फडणवीसांना तसं वाटत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राजकारण ही वैचारिक लढाई आहे. जर फडणवीसांनी नव्या सरकारबद्दलची तारीख ठरवली असेल तर त्यासाठीही त्यांना शुभेच्छा’, असे संजय राऊत म्हणाले.
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस हे सोलापूरात आले होते. त्यावेळी त्यांनी जाहीरसभेत बोलताना सरकार पाडण्याबाबत विधान केले होते. ‘सरकार केव्हा पाडायचे आणि नवे सरकार केव्हा आणायचे ते तुम्ही माझ्यावर सोडा’, असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या विधानाबाबत संजय राऊत Sanjay Raut यांना विचारले असता ते म्हणाले, ‘फडणवीसांना तसे वाटत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राजकारण ही वैचारिक लढाई आहे. जर फडणवीसांनी नव्या सरकारबद्दलची तारीख ठरवली असेल तर त्यासाठीही त्यांना शुभेच्छा’. तसेच महाराष्ट्राची वैद्यकीय यंत्रणा सर्वोत्तम आहे. सणांवर निर्बंध लादण्यात कोणालाही आनंद होत नसतो. पण जीवाचा प्रश्न असल्यास सणांवर निर्बंध लावण्याची हिंमत या सरकारमध्ये आहे. नियमांचे नीट पालन झाल्यास पुढील गुढीपाडवा आरोग्यदायी आणि कोरोनामुक्त असेल, असेही ते म्हणाले.
रेमडेसीविरसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने भाजप नेत्याचा नंबर केला शेअर, पोलिसात तक्रार
दरम्यान, राज्यात गुढीपाढव्यामुळे काही ठिकाणी गर्दी दिसत आहे. पण त्यामध्ये आता लोकांनीच शिस्त पाळली पाहिजे. तसे झाले नाही तर लॉकडाउन हा एकच पर्याय आहे. सध्या देशात लोक नियम पाळत नाहीत हे उघड आहे. त्यामुळे राज्याऐवजी देशात असा निर्णय लावला तर आश्चर्य वाटायला नको. महाराष्ट्रातच नव्हे तर हरिद्वार, बंगालमध्ये पण हेच सुरू आहे, असेही ते म्हणाले.
Lockdown in Maharashtra : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार – मंत्री अस्लम शेख
पुणे जिल्हयात कपांऊडर 2 वर्षापासून चालवत होता मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल
देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर घणाघात, केला ठाकरे सरकारवर ‘हा’ गंभीर आरोप
‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला
‘प्राण जाये पर वचन न जाये’, असं उद्धव ठाकरेंचं कार्य’, मुख्यमंत्र्यांची पाठराखण
..हे तर ‘महावसूली’ सरकार अन् ‘जिथं जाऊ तिथं खाऊ’ ही मंत्र्यांची कामे : फडणवीस
‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला
…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल
‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात