सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच भाजप खासदार उदयनराजे भोसले UdayanRaje Bhosle यांनी कोरोना व्हायरसच्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता त्यांनी सचिन वाझे प्रकरणावर भाष्य केले.
गुढीपाडव्यापासून प्रारंभ होणारा ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द
उदयनराजे UdayanRaje Bhosle यांनी सातारा शहरात शनिवारी अनोखे ‘भीक मांगो’ आंदोलन केले. त्यानंतर ते म्हणाले, ‘कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले लॉकडाऊन हे सर्वसामान्य गरिबांची उपासमार करणारे आहे. हे लॉकडाऊन तत्काळ उठवा. नाहीतर लोक भुकेपोटी दरोडे टाकतील. तसेच कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे, असे कुठला तज्ज्ञ सांगतो. त्याचे स्पष्टीकरण आधी जनतेला ड्यला हवे. आता केलेला लॉकडाऊन अत्यंत चुकीचा आहे. लोक नियम पाळणार नाहीत’.
वाझे प्रकरणावर ते म्हणाले, ‘आज लोकांना लसीकरण मिळेना. इथं ढिगाने पैसे खात आहेत, ज्यांनी लस घेतल्या आहेत, तेही कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. कोण हा वाझे, एवढे पैसे मग यापूर्वी किती? याला एवढे पैसे, त्याला तेवढे पैसे. पण, इथे गोरगरीबांचे नुकसान का करताय? लॉकडाऊन करण्याचा अधिकार तु्म्हाला दिला कुणी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात
Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’
सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल
मोहन भागवतांना कोरोना झाल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले – ‘आता भिडे गुरुजींना विचारा’