कोलकता : “जगातील सर्वांत मोठा खंडणीखोर पक्ष भाजप हा आहे. त्यांना पश्चिम बंगालमध्येकधीही सत्ता स्थापन करू दिली जाणार नाही,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी mamata banerjee यांनी आज केले. भाजप दंगली घडवून आणते. लोकांना ठार मारले जात असून दलित मुलींवर अत्याचार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हल्दिया येथे आयोजित रॅलीमध्ये त्या बोलत होत्या. त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.
ममतादीदी mamata banerjee म्हणाल्या, ‘‘धमक्या देऊनच भाजपने आतापर्यंत स्वतःचा विस्तार केला आहे. पश्चिम बंगालमधील लोकांना शांतता हवी असेल, राज्यामध्ये दंगली नको असतील तर त्यांच्यासमोर केवळ तृणमूल काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे. लोकांना मारण्यासाठी देशात दंगली घडवून आणणाऱ्या पक्षाला राज्यामध्ये कधीही सत्ता स्थापन करू दिली जाणार नाही. भाजपमधील महिला देखील सुरक्षित नाही. लोकशाही मार्गाने भाजप कधीच निवडणूक जिंकू शकत नाही. ’’
‘या’ 6 घरगुती उपायांमुळे कायमच्या नाहीशा होतील सुरकुत्या, जाणून घ्या
पंतप्रधान मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली. रेल्वे, कोळसा, बीएसएनएल, विमा, अंतराळ आणि बँका आदींचे खासगीकरण केले जात आहे. आता काहीजण तर हल्दिया बंदर देखील विकण्यात येईल अशी चर्चा करत आहेत. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे संरक्षण करावे, असे आवाहन देखील ममतांनी केले.
मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल
Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या
शिवसेनेचा भाजपला इशारा ! सांगली-जळगावात ‘करेक्ट’ कार्यक्रम ही तर ‘नांदी’
Birthday SPL : अलका याग्निक यांनी बॉलिवूड का सोडलं? समोर आलं थक्क करणारं कारण
…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’
मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय
‘या’ आमदाराची संपत्ती 5 वर्षांत वाढली चक्क 1985 टक्क्यांनी !