IMPIMP

Bombay High Court | रात्री उशीरापर्यंत फिरणार्‍यांना कधीही प्रश्न विचारू शकतात पोलीस, मुंबई HC ची टिप्पणी

by nagesh
Palghar Sadhu Case | palghar sadhu murder 10 released on bail mumbai bombay high court Justice Bharati Dangre

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाBombay High Court | रात्री उशिरा बाहेर असलेल्या लोकांची चौकशी करण्याचा पोलिसांना पूर्ण अधिकार आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) म्हटले आहे. कोर्टात तीन वर्षे जुन्या खटल्याची सुनावणी झाली, ज्यामध्ये एका व्यक्तीवर दारूच्या नशेत गाडी चालवण्याचा आणि पोलिसांपासून पळून गेल्याचा आरोप होता. याप्रकरणी पोलिसांनी (Maharashtra Police) एफआयआर दाखल केला होता. आता न्यायालयाने त्या व्यक्तीविरुद्ध दाखल केलेला एफआयआर (FIR) रद्द करण्यास नकार दिला आहे. (Bombay High Court)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

टाईम्स ऑफ इंडियानुसार, उपनिरीक्षकाने Police Sub Inspector (PSI) 2 फेब्रुवारी 2019 रोजी एफआयआर दाखल केला होता. त्यादरम्यान मद्यधुंद वाहनचालकांची (Drunk Drivers) चौकशी करण्यासाठी विलेपार्ले येथे पोलिस तैनात करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी 1.50 वाजता एक चालक तेथून गेला. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता बॅरिकेडला धडक देत तो पळून गेला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला अंधेरी पुलाजवळ (Andheri Bridge) अडवले.

 

त्यानंतर दोन कारमध्ये सात जण असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यात दोन महिलांचाही समावेश होता. पहिल्या कारचा चालक (Car Driver) दारूच्या नशेत होता आणि तपास करण्यास नकार देत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर त्यांनी लाच देण्याचाही प्रयत्न केला. अहवालानुसार, तपासणीत तरुण दारू प्यायल्याचे निष्पन्न आढळला आणि त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स Driving Licence नव्हते. (Bombay High Court)

 

त्यानंतर या टोळक्याने त्यांच्या फोनने व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला आणि दंडाच्या पावतीवर सही करण्यास नकार दिला.
त्यादरम्यान दोन्ही बाजूंमध्ये वादावादी झाली.
7 जणांनी पोलिसांशी गैरवर्तन केले आणि घटनास्थळी पाठवलेल्या अतिरिक्त लोकांनाही मारहाण केल्याचा आरोप एफआयआरमध्ये आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या खटल्यात याचिकाकर्त्यांच्या वकील रोहिणी वाघ यांनी कलमांवर प्रश्न उपस्थित केला.
रिपोर्टनुसार, तो दुसर्‍या कारमध्ये होता आणि पहिल्या कारमधून महिला खाली उतरल्यानंतर त्याने जागा बदलली होती.
तरुण दारू प्यायला नसल्याचे सांगण्यात आले.
वकिलाने असेही म्हटले की याचिकाकर्त्याने नवीन काम सुरू केले आहे आणि त्याचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही.

 

कोर्टाने म्हटले की, याचिकाकर्ता वेगळ्या कारमध्ये बसला होता आणि पहिल्या कारमध्ये बसलेल्या महिला उतरल्यानंतर सीट बदलली होती, याने काहीही फरक पडत नाही.
ते म्हणाले, यानंतर पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण झाली, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.

 

Web Title :- Bombay High Court | Mumbai bombay high court news maharashtra police have right to ask question people roaming at night

 

हे देखील वाचा :

Pune Crime | टेम्पो मागे घेण्यास सांगितल्याने गुंडाच्या टोळक्याने कामगाराला बेशुद्ध पडेपर्यंत केली मारहाण; पिसोळी येथील घटनेत तिघा सराईतांना अटक

New Portal Of Modi Government | मोदी सरकार आणत आहे नवीन पोर्टल ! PM आवास, उज्जवलासह 15 योजनांचा लाभ एकाच वेळी घेऊ शकता

Pune Crime | अल्पवयीन मुलींचा बलात्कार करुन त्यांना केले गर्भवती; पुण्यात एका दिवशी दोन घटनांमध्ये दोन गुन्हे दाखल

 

Related Posts