मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. या बाबतीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे rajesh tope म्हणाले कि, लॉकडाऊन सध्या कुणालाच नको आहे. पण परिस्थिती येते तेव्हा तहान लागल्यावर विहीर खोदू शकत नाही. लॉकडाऊन ऐनवेळी लावणे शक्य नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे.
‘POK वर ताबा मिळवणे विसरून जा’; स्वामींचा भाजपला ‘घरचा आहेर’
राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने सगळीकडे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सर्व क्षेत्राचा अभ्यास करुन लॉकडाऊन संबंधित निर्णय घेण्यात येतो. सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवून निर्णय घेतला जातो. त्यामुळे सगळे निर्बंध केले जातात. पण जनता या निर्बंधाला नीट प्रतिसाद न देता बिनधास्तपणे वावरत आहेत आणि यामुळेच कोरोना वाढत आहे. असेसुद्धा आरोग्यमंत्री राजेश टोपे rajesh tope म्हणले आहे.
आता कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला कि रुग्णांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे बेडची संख्या ही रुग्ण संख्यापेक्षा कमी असते तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊन करावा लागतो. पण जर ICU आणि ऑक्सिजन बेडची संख्या याबाबत तक्रारी येऊ लागल्या तर लॉकडाऊन करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. याबाबतीत सध्या अभ्यास चालू आहे. काहीजणांना लॉकडाऊन नको आहे पण सगळा विचार करून मध्यबिंदू गाठून निर्णय घ्यावा लागेल,असे राजेश टोपे rajesh tope यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या राज्यात कोरोना वेगाने पसरत आहे. त्यामुळे काही शहरात बेड्सची कमतरता भासत आहे. या क्षणाला रुग्णालयात बेड मिळतच नाही असे नाही. कालच्या बैठकीत खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के बेड ताब्यात घेतले पाहिजे, ज्यामुळे बेड कमी पडणार नाही. तसेच ८० टक्के ऑक्सिजन सिलेंडर्सचा वापर मेडिकल कारणांसाठी केला जावा, अशा सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. असे देखील राजेश टोपे म्हणाले आहेत.
केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’
सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण
अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार
‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’
शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’
चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट