नवी दिल्ली : वृत्तसंस्था– PMGKY | देशात 80 कोटी म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जनता गरीब असून कोरोना काळात या लोकांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKY) सुरू केली होती. या अंतर्गत सुमारे 80 कोटी गरीब रेशनकार्ड धारकांना प्रति महिना, प्रति सदस्य 5 किलो धान्य (गहू-तांदूळ) देण्यात आले. देशातील ज्या नागरिकाकडे रेशन कार्ड आहे, ते आपल्या कोट्यातील रेशनसह या योजनेंतर्गत दर महिना 5 किलो अतिरिक्त रेशन मोफत घेत आहेत.
यावर्षी दिवाळीपर्यंत चालणार योजना
या योजनेंतर्गत केंद्र सरकारद्वारे रेशन कार्डधारक प्रत्येक सदस्याला दरमहिन्याला 5 किलो अतिरिक्त गहू आणि तांदूळ देण्यात आले.
ही योजना मागील वर्षी कोरोना काळात सुरूझाली. त्यानंतर पुन्हा एकदा योजनेचा कालावधी वाढवण्यात आला.
दुसर्या टप्प्यात 4 नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरू राहणार असून नंतर बंद करण्यात येईल. (PMGKY)
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update
PMGKY बंद झाल्यानंतर देशातील सर्व रेशन कार्डधारकांना पहिल्या प्रमाणेच धान्याचे वितरण केले जाईल.
ज्यामध्ये रेशन कार्ड धारकांना कोट्यातून मिळणार्या रेशनसाठी पैसे भरावे लागतात.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत मिळणारे अतिरिक्त रेशन पूर्णपणे मोफत होते, ज्यासाठी एक पैसाही घेतला जात नव्हता.
Web Title : PMGKY | from this day the distribution of free ration will stop across the country 80 crore people will be affected by the closure of pmgky
Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा मोठा दावा, म्हणाले – ‘अनिल देशमुखांच्या अटकेनंतर आता पुढचा नंबर…’
Winter Tips | थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याने होते नुकसान, ‘या’ 10 चूका करणे टाळा; जाणून घ्या