मेलबर्न : वृत्तसंस्था – Windies Cricket | एकेकाळी संपूर्ण क्रिकेट विश्वात ज्या टीमचा दरारा होता अशी विश्वविजेती टीम वेस्ट इंडिजच्या (West Indies) टीमची सध्याची अवस्था फार बिकट झाली आहे. एका छोट्याशा टीमने पराभव केल्यानंतर सुपर 12 च्या राऊंडमध्ये सुद्धा विंडीजची टीम (Windies Cricket) पोहोचू शकली नाही. यामुळे वेस्ट इंडिजची वर्ल्डकपमधून (T-20 World Cup) बाहेर पडली. यानंतर वेस्ट इंडिजच्या अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी खेळाडूंसह वेस्ट इंडिजच्या क्रिकेट बोर्डवरती जोरदार टीका केली. या टीममध्ये एकहाती विजय खेचून आणण्याची ताकद असणारे खेळाडू असतानादेखील टीमची अशी अवस्था झाल्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
वेस्ट इंडिजच्या संघाने विश्वचषक स्पर्धा आतापर्यंत दोनवेळा जिंकली आहे. 2012 आणि 2016 ला विंडीज टीमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांनी विश्वचषक जिंकला होता. सध्याच्या वेस्ट इंडिजच्या संघाची (Windies Cricket) अवस्था बघून माजी विश्वचषक विजेत्या कर्णधार डॅरेन सॅमी (Darren Sammy) याच्या डोळ्यात पाणी आले आहे.
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड (West Indies Cricket Board) आपल्या खेळाडूंना राष्ट्रीय संघाच्या सामन्यांऐवजी फ्रँचायझी लीग खेळण्यास कधीही रोखू शकत नाही.
त्याच्या बरोबर उलट टीम इंडियाचे आहे. म इंडियाचं क्रिकेट बोर्ड खेळाडूंना थांबवू शकतं.
कारण त्यांच्याकडे पैसा आहे असे यावेळी माजी विश्वचषक विजेत्या कर्णधार डॅरेन सॅमी म्हणाला.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Windies Cricket | former world cup winning captain could not hold back his tears by discussing the current condition of windies cricket
Aishwarya Rai | करीनाच्या कृपेनेच ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एन्ट्री…