IMPIMP

Maharashtra Politics | देवेंद्र फडणवीसांच्या विरोधानंतरही नवाब मलिक बैठकीस हजर; महायुतीत वादाची ठिणगी पडणार?

by sachinsitapure

मुंबई: Maharashtra Politics | भाजपकडून नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या महायुतीतील (Mahayuti) प्रवेशाला जाहीर विरोध केलेला असताना अजित पवार यांनी मलिकांना बैठकीस बोलावल्याने महायुतीत वादंग होण्याची शक्यता आहे (BJP). अजित पवारांना (Ajit Pawar) लिहिलेल्या पत्रात फडणवीसांनी मलिक यांचा उल्लेख केला होता. त्यामध्ये ” नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला निर्णय आहे. हे मान्यच आहे परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटकपक्षाला करावाच लागत असतो. असं म्हणत नवाब मलिकांना महायुतीपासून दूर ठेवा असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हंटले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि आमदारांची बैठक काल पार पडली. अजित पवारांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) , दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यासह इतर नेते हजर होते. या बैठकीला पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक हे देखील उपस्थित होते. भाजपाकडून मलिक यांच्या महायुतीतील प्रवेशाला जाहीर विरोध केलेला असताना अजित पवारांनी मलिकांना बैठकीस बोलवल्याने वादंग निर्माण होऊ शकतो.

मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामुळे अटकेची कारवाई झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिक हे जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. तुरुंगाबाहेर येताच नवाब मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आपले समर्थन दिले होते. तसेच अधिवेशन काळात ते सत्ताधारी बाकांवरही बसले होते. मात्र गंभीर आरोप असलेले मलिक हे महायुतीसोबत नकोत, अशी भूमिका घेत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना पत्र लिहिले होते.

हे पत्र सार्वजनिक करण्यात आल्याने अजित पवार काहीसे नाराजही झाले होते. मात्र त्यानंतर मलिक यांना पक्षाच्या बैठकांपासून दूर ठेवण्यात आले. परंतु आता पुन्हा एकदा नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर झाल्याने अजित पवारांनी भाजपचा विरोध झुगारून नवाब मलिकांना पुन्हा पक्षासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे का, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

Related Posts