सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन– Sadabhau Khot | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas
Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात सतत राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. अशातच भाजप नेते (BJP Leader) आणि रयत
क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार
आरोप केला आहे. ‘शरद पवारांचं नाव आता आगलावे करावं,’ असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
त्यावेळी बोलताना सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले की, ”शरद पवार हे महान नेते आहेत. त्यांनी राज्यामध्ये काड्या करण्याशिवाय काहीही काम केलं नाही. जाईल तिथे आग लावायची. त्यांचं आयुष्य आग लावण्यामध्येच गेलं. म्हणून त्यांचं आडनाव बदलून आगलावे ठेवावं,’ अशी टीका त्यांनी केली. तसेच, इतकंच नाही तर पवारांचं आडनाव आगलावे केल्याने महाराष्ट्रात होरपळणारी आग शांत होईल,” असं देखील सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ”येड्यांच्याच मागे ईडी (ED) लागल्याची राज्याची स्थिती आहे. जे सज्जन आहेत त्यांना काहीही त्रास नाही. ईडीच्या धाडी या शहाण्या – सज्जनांच्या घरी पडत नाहीत. हे येडे आहेत म्हणून येड्याच्या घरी धाडी पडतात’. तर शेतकऱ्यांना वीज बिल मागाल तर दांडक्याने सोलून काढू. तुम्हाला आता संपूर्ण वीजबिल माफचं करावं लागेल,” असा इशारा देखील सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
Web Title :- Sadabhau Khot | sadabhau khot serious criticism of sharad pawar solapur news