IMPIMP

Sanjay Raut | ‘जे मिंधे, मांडलिक असतात, त्यांना…’; संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

by nagesh
MP Sanjay Raut | sanjay raut hilarious comment trolls cm eknath shinde being inactive in amruta fadnavis blackmailing case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Sanjay Raut | राज्याचे हिवाळी अधिवेशन हे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील संघर्षाने चांगलेच गाजले. आता सर्वांचे लक्ष हे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागले आहे. यातही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा पहायला मिळण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या टोलेबाजीवर आज माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. संजय राऊतांनी शिंदे गटाला टोळीची उपमा देत त्यांच्यावर हल्लाबोल केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माध्यमांनी आज ( दि. ३ जानेवारी) संजय राऊतांना (Sanjay Raut) गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यावर संजय राऊतांनी परखड शब्दात गुलाबराव पाटलांवर टीका केली. ‘आम्हाला भाजपाने एकही जागा दिली नाही तरी चालेल’, असं गुलाबराव पाटील म्हणाल्याचं एका पत्रकारांनी विचारलं असता त्यावर गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांनी या वक्तव्यावर चांगलाच समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले, ‘कारण जे मिंधे असतात, मांडलिक असतात, त्यांना स्वत:चं अस्तित्वच नसतं. ते भाजपामध्ये विलीन झाले आहेत. तसेच त्यांच्यातला स्वाभिमान संपलेला आहे. त्यांना तर शिवसेनेची भाजपसोबत युती करायची होती पण आता तर ते आपला पक्षचं भाजपमध्ये विलीन करत आहेत. आणि त्यामुळेच त्यांनी एकही जागा नकोय. मात्र शिवसेना यापुढेही संघर्ष करत राहील.’ अशा खोचक शब्दात संजय राऊतांनी गुलाबराव पाटील यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

 

तसेच याबाबत पुढे बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ‘त्यांचा एक गट आहे. एक टोळी आहे.
आणि टोळीला आस्तित्व नसतं. टोळी गँगवारमध्ये किंवा पोलिस एन्काऊंटरमध्ये मारली जाते.
हे स्वतःला जर टोळी मानत असतील तर त्यांचे म्हणणे बरोबर आहे. त्यांना एकही जागा नको.
जितके दिवस आहेत, तितके दिवस खंडण्या गोळा करायच्या आणि नंतर परदेशात पळ काढायचा असे त्यांचे नियोजन असेल.’

 

त्याचबरोबर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याची पाठराखन करत
भाजपला टोला लगावला. त्यांनी (Sanjay Raut) भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी
केलेले विधान मान्य आहे का? असा सवाल केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena sanjay raut slams cm eknath shinde group bjp gulabrao patil

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | मुंढव्यातील तारांकित हॉटेलच्या मॅनेजरची महिला सहकार्‍याकडे शरीरसंबंधाची मागणी, विनयभंगाचा गुन्हा

Gauahar Khan | बेबी बम्प फ्लॉन्ट करत बिग बॉस फेम गौहर खानने केले हटके फोटोशूट

 

Related Posts