IMPIMP

वनमंत्री राठोड यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादांचे मिश्किल उत्तर; म्हणाले- ‘भेट झाली तर सांगेन पत्रकार तुमची वाट बघतायत’

by sikandershaikh
ajit-pawars-mischievous-

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. या प्रकरणानंतर राठोड गायब झाले आहेत. त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणी सरकारला धारेवर धरले आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना विचारले असता ते म्हणाले की, संजय राठोड यांची भेट झाली तर सांगेन की सर्व पत्रकार तुमची आत्मितयेतेने वाट पाहत आहेत. तुम्ही त्यांची एकदा भेट घ्या, अशी मिश्किल टिप्पणी पवार यांनी केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यापासून संजय राठोड गायब आहेत. अद्याप ते माध्यमांसमोर आले नाहीत. त्यामुळे ते समोर कधी येतील? असा प्रश्न पत्रकारांनी पवार यांना विचारला. तेव्हा त्यांची भेट झाल्यानंतर आपण त्यांना तुमची भेट घेण्यास सांगू असे उत्तर पवार (ajit pawar) यांनी दिले आहे. तसेच या प्रकरणात पोलीस योग्य तपास करतील आणि सत्य समोर आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. इतकच नाही तर एकेकाळी एखादा आरोप झाल्यावर लोकप्रतिनिधी आपल्या पदाचा राजीनामा देत होते. पण आता तो काळ राहिला नसल्याचे पवार म्हणाले.

दरम्यान पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेऊन त्यांच्यावर आरोप केले आहेत.
तरीही गेल्या 12 दिवसांपासून राठोड प्रसारमाध्यमांसमोर आले नाहीत. त्यांनी आपली बाजूही मांडलेली नाही.
मात्र, आता पुणे पोलिसांनी त्यांच्या चौकशीचे सुतोवाच केल्याने राठोड सर्वांसमोर येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

एकेकाळी केलं राम मंदिराच्या आंदोलनाचं नेतृत्व; विश्व हिंदू परिषदेच्या ज्येष्ठ नेत्याच्या भावाकडून 11 कोटींची देणगी !

Related Posts