सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) सध्या भाजप (Bharatiya Janata Party – BJP) च्या रडारवर आहेत. भाजपनं हिंगणघाट तरुणीचा मृत्यू ते पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणांसह (Pooja Chavan Suicide Case) विविध घटनांचा हवाला देत अनिल देशमुख यांना काही प्रश्न केले आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. भाजपनं अनेक ट्विट करत आपलं म्हणणं मांडलं आहे आणि राज्यांच्या गृहमंत्र्यांना विविध सवालही केले आहेत.
‘एका तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळलं जातं, अद्याप दोषींवर नाही’
भाजपनं लिहिलंय की, एका तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळलं जातं. या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. घटनेला एक वर्ष झालं, मात्र अजूनही दोषींवर कारवाई करण्यात आली नाही. तिला न्याय कधी मिळणार हे अनिल देशमुख यांनी एकदा जाहीर करावं अशी मागणी देखील भाजपनं केली आहे.
एका तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळले जाते, या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. घटनेला एक वर्ष पूर्ण झालं, मात्र अजूनही दोषीवर कठोर कारवाई करण्यात आली नाही. गृहमंत्री @AnilDeshmukhNCP तिला न्याय कधी मिळणार, हे एकदाचं जाहीर करावं. #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/62ghfrb9de
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021
‘निर्दोष साधूंची 100 जणांकडून निर्घृण हत्या होते, गृहमंत्र्यांचा एकही शब्द नाही‘
आणखी एका ट्विटमध्ये भाजपनं लिहिलं की, महारष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत निर्दोष साधूंची 100 जणांच्या जमावाकडून निर्घृण हत्या होते. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh एकही शब्द काढत नाहीत. कारवाई तर दूरच मारेकरी अजूनही मोकाट फिरताहेत, ही शोकांतिका आहे अशी खंतही भाजपनं व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत निर्दोष साधूंची १०० जणांच्या जमावाकडून निर्घृण हत्या होते, मात्र त्यावर एक शब्दही आपले गृहमंत्री @AnilDeshmukhNCP काढत नाहीत, कारवाई तर दूरच. मारेकरी अजूनही मोकाट फिरताहेत, हीच शोकांतिका ! #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/iMBwe4UXt6
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021
‘या सर्व प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख साहेब तुम्ही काय केलं ?’
पूजा चव्हाण प्रकरणावर बोलताना आपल्या ट्विटमध्ये भाजपनं म्हटलं आहे की, माजी मंत्री संजय राठोड पूजा चव्हाण या तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतात, त्याचा फक्त राजीनामा घेतला जातो, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळं…. मग या सर्व प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख साहेब तुम्ही काय केलं ? तुमचं कर्तव्य विसरलात की, आठवून करून द्यावी लागेल असा टोलाही भाजपनं गृहमंत्र्यांना लगावला आहे.
मंत्री संजय राठोड पूजा चव्हाण या तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतो, त्याचा फक्त राजीनामा घेतला जातो, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे… मग या सर्व प्रकरणात गृहमंत्री @AnilDeshmukhNCP साहेब तुम्ही काय केलं? तुमचं कर्तव्य विसरलात की आठवण करून द्यावं लागेल ! #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/rpq2grUUVB
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021
‘शर्जील उस्मानी महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाविरुद्ध गरळ ओकतो, कारवाई नाही’
आपल्या आणखी एका ट्विटमध्ये भाजपनं लिहिलं की, विकृत बुद्धीचा शर्जील उस्मानी शिवरायांच्या महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाविरुद्ध गरळ ओकतो. मात्र दु्र्दैवानं गृह खातं त्याच्यावर कसलीही कारवाई करत नाही. कारण आपले गृहमंत्री अनिल देशमुख गाढ झोपेत आहेत अशी टीकाही भाजपनं केली आहे.
विकृत बुद्धीचा शर्जील उस्मानी शिवरायांच्या महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाविरुद्ध गरळ ओकतो. मात्र दुर्दैवाने गृहखातं त्याच्यावर कसलीही कारवाई करत नाही, कारण आपले गृहमंत्री @AnilDeshmukhNCP गाढ झोपेत आहेत. #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/kBcsCySrbP
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021
‘सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचा युवा प्रदेशाध्यक्ष महिलेवर बलात्कार करूनही मोकाट’
एका बलात्कार प्रकरणावर बोलातना भाजपनं लिहिलं की, सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचा युवा प्रदेशाध्यक्ष महिलेवर बलात्कार करून सुद्धा मोकाट फिरत आहे. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांनी तो स्वत:च्या पक्षाचा असल्यानं कसलीही कारवाई केली नाही. हे असंच सुरू राहिलं तर आपल्या माता भगिनी कशा सुरक्षित राहतील असा सवालही भाजपनं केला आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचा युवा प्रदेशाध्यक्ष महिलेवर बलात्कार करून सुद्धा मोकाट फिरत आहे, मात्र गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांनी तो स्वतःच्या पक्षाचा असल्यामुळे कसलीही कारवाई केली नाही. हे असंच सुरू राहिलं तर आपल्या माता-भगिनी कशा सुरक्षित राहतील?#ResignAnilDeshmukh pic.twitter.com/1g38MQAt2U
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021
गृहमंत्रीसाहेब तुमच्या बेजबाबदारपणामुळं पोलीस भरतीच्या मुलांनी जाव द्यावा का?
पोलीस भरतीबाबत बोलताना भाजपनं लिहिलं की, रात्रंदिवस मेहनत करून पोलिसात भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांच्या वाट्याला निराशाच… पोलीस भरती बाबत कसलीही घोषणा नाही. मुलांच्या भविष्याशी खेळ चालला आहे. गृहमंत्रीसाहेब तुमच्या बेजबाबदारपणामुळं या मेहनत करणाऱ्या मुलांनी जीव द्यावा का ?
रात्रंदिवस मेहनत करून पोलीसांत भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांच्या वाट्याला निराशाच… पोलीस भरतीबाबत कसलीही घोषणा नाही, मुलांच्या भविष्याशी खेळ चालला आहे. गृहमंत्रीसाहेब, तुमच्या बेजबाबदारपणामुळे या मेहनत करणाऱ्या मुलांनी जीव द्यावा का? #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/tG3SISuHvq
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021
‘गृह खातं अनिल देशमुख यांच्याकडेच राहणार’
अंबानी स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर भाजपकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीनं जोर धरला आहे. परंतु गृह खातं अनिल देशमुख यांच्याकडेच राहणार असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं आहे.
Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?