मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : राज्यात कोरोना Corona व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे दिसत नाही. त्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेत रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याविषयी चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व काही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तरीही नाईट कर्फ्यूसारखी विविध निर्बंध लावण्यात आली आहेत. तरीही रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे दिसत नाही. पण आता राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावावा, अशी मागणी सत्ताधारी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून केली जात आहे.
15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात येणार आहे. या सर्व नेत्यांचे विचार, म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच संपूर्ण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे.
तीन आठवड्यांचा लॉकडाऊन करा : वडेट्टीवार
कोरोनाबाधित Corona रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाऊनने काही होणार नाही. संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला प्रत्येक पाऊल उचलणे गरजेचे आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा आहे, असे कॅबिनेटमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते.
सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल
मोहन भागवतांना कोरोना झाल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले – ‘आता भिडे गुरुजींना विचारा’
Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’
..अन्यथा ‘मराठवाडी’ च्या जलाशयात सत्याग्रह – नरेंद्र पाटील
गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु
MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल
Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !